Wildlife Conflict : मानव-वन्यजीव संघर्ष वाढला

Tiger Attack In Wardha : समुद्रपूर तालुक्याला लागूनच ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाकेच्या अंतरावर आहे, तर बोर अभयारण्य आणि उमरेडचे कऱ्हांडचा व्याघ्र प्रकल्प तालुक्याच्या नजीक आहे.
Tiger missing
Tiger missingAgrowon
Published on
Updated on

Wardha News : तालुक्यात वाघिणींसह अनेक वन्यजीवांचा वावर वाढल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात ८ हजार ९९१ हेक्टर वनक्षेत्र असून, यामध्ये दोन वाघ, तीन शावक, पाच ते सहा बिबट, अस्वल, रानगव्हे, रानडुक्कर, हरिण, रान कुत्रे आणि इतर वन्यजीवांचा वावर आहे.

गत वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या, तर ८१ पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले, त्यात २२ पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. शेत पिकांच्या नुकसानीच्या ४१२ प्रकरणांमध्ये नुकसानभरपाई मिळाली असली तरी शेतकऱ्यांना ती योग्य आणि पुरेशी वाटत नाही. वनविभागाने ३४ लाख १५ हजार २१६ रुपये नुकसानभरपाई दिली आहे, पण मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती भरपाई करणे समस्या सोडवते का, यावर प्रश्‍नचिन्ह आहे.

Tiger missing
Wildlife Water Crisis : हरणांसह वन्यप्राण्यांसाठी टॅंकरने पाणवठ्यांमध्ये पाणी

वन्यजीवांचे सतत येणे-जाणे

समुद्रपूर तालुक्याला लागूनच ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाकेच्या अंतरावर आहे, तर बोर अभयारण्य आणि उमरेडचे कऱ्हांडचा व्याघ्र प्रकल्प तालुक्याच्या नजीक आहे. या जंगलांतून मोठ्या प्रमाणावर वन्यजीवांचे येणे-जाणे असते, ज्यामुळे परिसरातील वन्यजीवांचा वावर अधिक वाढलेला आहे. वाघीण आणि तिच्या चार शावकांसह त्या भागात वास्तव्यास आहे. शावकाच्या अपघातात मृत्यू झाल्यामुळे वाघिणीचे वास्तव्य त्या भागात कायम झाले आहे. त्यामुळे धोंडगाव शिवारातील २५ गावातील नागरिक दहशतीत आहेत.

तालुक्यात निलगाय, रानडुक्कर आणि माकडांचे कळप मोठ्या प्रमाणात आहेत. या वन्यजीवांच्या कळपांचा शेतीपिकांवर मोठा परिणाम होतो. माकडेही पिकांसोबतच गावातील घरांमध्ये घुसून मोठा हैदोस घालतात. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे नुसते पिकांचेच नुकसान होत नाही, तर ते घरांची दारे, खिडक्या आणि इतर वस्तू देखील नष्ट करतात.

Tiger missing
Wildlife Census : वैशाख पौर्णिमेच्या रात्री काटेपूर्णा अभयारण्यात प्राणिगणना

जागतिक सुरक्षा, प्रशिक्षण

शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना वन्यजीवांच्या वावराच्या बाबतीत जागरूकता देणे आणि योग्य प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वनविभागाने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात.

वैयक्तिक सुरक्षा उपाय

माकडे, निलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी वन्यजीव संरक्षण यंत्रणांचे पाऊल उचलले पाहिजे. विशेषतः माकडांचे कळप पिकांना नुकसान पोहोचवतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केली जावी.

शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, वन्यजीवांचा स्थलांतर मार्ग निवडणे आणि त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. वनविभागाने तातडीने जंगलातील सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- हर्षल उमरे, सर्पमित्र समुद्रपूर
नियमित या भागात वाघाचे आणि अन्य वन्यप्राण्याचे वास्तव्य राहत असल्याने गिरड सहवन क्षेत्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पत जोडण्यात यावे असा ठराव संबंधित विभागाला पाठविण्यात आला. यावर कारवाही होने अपेक्षित आहे.
- राजू नौकरकर, सरपंच, गिरड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com