Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Scheme: एक टक्का व्याज सवलतीसाठी २० कोटी वितरणास मान्यता

Rural Loan Support: शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्जपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणऱ्या एक टक्का व्याजसवलती पोटी २० कोटी ५६ लाख रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

Team Agrowon

Mumbai News: शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्जपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणऱ्या एक टक्का व्याजसवलती पोटी २० कोटी ५६ लाख रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार ज्या बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करतात, त्या बँकांनी सातऐवजी सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, असे राज्य सरकारने धोरण आहे. त्यानुसार एक टक्का फरकाची रक्कम राज्य सरकार बँकांना देते.

२००६-०७ पासून खरीप आणि रब्बी हंगामापासून राज्यातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका तर २०१३-१४ पासून तीन लाखांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्जवाटप करणाऱ्या खासगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येतो.

त्यानुसार २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीककर्ज वाटप करणाऱ्या बॅंकांना परतावा देण्यासाठी १०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्यापैकी २० कोटी ५६ लाखांच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT