Sugar Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry : केंद्राचे साखर उद्योगाला आणखी धक्कातंत्र

Sugar Packing : साखरेचे २० टक्के पॅकिंग तागाच्या पोत्यात भरण्याची सक्ती

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुलेः अॅग्रोवन वृत्तसेवा
Ethanol Production Ban : कोल्हापूर ः केंद्राने साखर उद्योगाला धक्के देण्याचा सपाटाच लावला आहे. इथेनॅाल निर्मितीवर निर्बंध आणल्यानंतर आता साखर पॅकिंगसाठी एकूण वीस टक्के पॅकिंग ज्यूटच्या (ताग) पोत्यात करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने ज्यूट वर्ष २०२३-२४ (१ जुलै, २०२३ ते ३० जून, २०२४) साठी ही सक्ती केली. १०० टक्के अन्नधान्य आणि २० टक्के साखर तागाच्या पोत्यामध्ये पॅक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्रीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यूट पॅकेजिंग मटेरियलमधील सक्ती केल्याने गेल्या वर्षी (२०२२-२३) पॅकेजिंगसाठी देशात उत्पादित कच्चा तागाच्या सुमारे ६५ टक्के ताग वापरला गेला. भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सर्वसाधारणपणे आणि पूर्वेकडील प्रदेशात म्हणजे पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, त्रिपुरा, मेघालय, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ज्यूट उद्योगाचे महत्त्वाचे स्थान आहे.

हा पूर्वेकडील, विशेषतः पश्चिम बंगालमधील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. ताग उद्योगाच्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के तागाच्या पोती (गोण्या) आहेत. ज्यापैकी ८५ टक्के भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य खरेदी संस्था यांना पुरवल्या जातात आणि उर्वरित पोत्यांची थेट निर्यात व विक्री केली जाते. केंद्र अन्नधान्याच्या पॅकिंगसाठी दर वर्षी अंदाजे १२,००० कोटी किमतीच्या तागाच्या गोण्या खरेदी करते, त्यामुळे ज्यूट उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या उत्पादनांना हमीभावाची बाजारपेठ निश्चित होते. तागाच्या गोण्यांचे सरासरी उत्पादन सुमारे ३० लाख गाठी आहे.


कारखानदारांकडून दुर्लक्षच
हा निर्णय व्यवहार्य नसल्याने कारखानदारांनी मात्र यापूर्वीही केंद्राच्या या नियमावलीकडे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. तागाच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेले अन्नधान्य शिजवण्यापूर्वी स्वच्छ केले जाते, मात्र या पिशव्यांमध्ये पॅक केलेल्या साखरेचे थेट सेवन केल्यास ते हानिकारक ठरते. तागाचे तंतू साखरेतून काढता येत नाहीत. या उद्योगात, बॅचिंग ऑइलचा वापर तागाचे तंतू लवचिक बनवण्यासाठी केला जातो.

जर थेट वापरल्या जाणाऱ्या साखरेच्या पॅकेजिंगमध्ये ज्यूट मटेरिअलचा वापर केला असेल, तर अशा तेलाचा वापर हानिकारक ठरू शकतो. पिशव्यांच्या मोठ्या छिद्रामुळे साखर बाहेर पडते आणि हवा खेळती राहिल्याने आर्द्रताही वाढते. या पिशव्यांमध्ये पॅक केलेली साखर कालांतराने रंग बदलते. या कारणांमुळे शीतपेये, बिस्किटे, कन्फेक्शनरीज, औषधी कंपन्या इत्यादी मोठ्या प्रमाणात ग्राहक अशा पिशव्यांमध्ये पॅक केलेली साखर स्वीकारण्यास नाखूष असतात. अशा कारणांमुळे कारखानदार ताग पॅकिंग करणे नाकारत असल्याचे चित्र आहे.


साखर उद्योगावर अन्याय करणारा निर्णय
साखर उद्योगातून मात्र या निर्णयाविषयी कमालीची नाराजी आहे. हे पॅकिंग आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना केंद्र सरकार सक्ती करीत असल्याचा आरोप साखर उद्योगातील संघटनेने केला आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून ताग उद्योगाला क्रॉस सबसिडी देणे अव्यवहार्य आहे. साखर क्षेत्रावर एकतर्फी निर्णय लादले जात आहेत. उद्योग आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी धडपडत असताना असे निर्णय साखर उद्योगाला आणखी गोत्यात आणू शकतात असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन

Rabi Jowar Sowing: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी

Brinjal Market: वर्षभर विविध वाणांच्या वांग्याला मागणी

Guava Farming: पेरू उत्पादनातून साधला हमखास उत्पन्नाचा मेळ

Maharashtra Voter Issue: मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा

SCROLL FOR NEXT