Ajit Pawar On NCP Manifesto Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : पंतप्रधान मोदींकडे राज्यातील योजनांसाठी मागितला केंद्राचा निधी ः अजित पवार

Maharashtra Government Scheme : अहिल्यानगर जिल्ह्यातून पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी या भागातील धरणात वळविण्याची योजना राबविणार आहोत. त्यासाठी ८५ हजार कोटींच्या निधीची गरज आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातून पश्‍चिमेला वाहून जाणारे पाणी या भागातील धरणात वळविण्याची योजना राबविणार आहोत. त्यासाठी ८५ हजार कोटींच्या निधीची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत दोन दिवसांपूर्वीच बोललो आहे. राज्यातील अन्य योजनांसाठीही केंद्राकडे निधी मागितला आहे. निळवंडे धरणाचा पाच दशकाचा रखडलेला प्रश्‍न आम्ही मार्गी लावला असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोपरगाव येथे गुरुवारी (ता. १४) सायंकाळी उशिरा आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. माजी आमदार अशोक काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच दशकांपासून प्रलंबित निळवंडे धरणाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर, राहाता राहरी, कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील

शेताला फायदा होणार आहे. निळवंडेचा पाच दशकांचा रखडलेला प्रश्‍न सोडविला. आधी पुढारी केवळ यायचे, नारळ फोडायचे. आता आम्ही त्यावर काम करतोय. कालव्याचे, चाऱ्या व राहिलेले काम करायचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातीतून पश्‍चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे पाणी, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणात वळवायचे आहे. ८५ हजार कोटी रुपयांची योजना आहे.

त्यासह राज्यातील अनेक योजनांसाठी नरेंद्र मोदी यांना दोन दिवसांपूर्वीच याबाबत बोललो आहे. केंद्राकडे निधी मागितला आहे. जागतिक बँक, वल्ड बॅंकेचा निधी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली आहे. सामान्य लोकांचे प्रश्‍न सोडणविण्याला प्राधान्य दिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांना आमदार केले आहे.

जातीय सलोखा राहिला पाहिजे. महिला, तरुण, तरुणी, शेतकरी आमच्या पाठीशी आहेत. सबका साथ सबका विकास करायचा आहे. फेक नेरेटिव्ह सेट केल्याने नुकसान होत आहे. भाषणे करताना महाराष्ट्रासाठी काय करणार ते सांगितले पाहिजे. व्हिजन काय ते सांगा. मात्र तसे करत नाहीत. संविधानाबाबत खोटं सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने कारखान्याला मदत करून साडेनऊ हजार कोटी रुपये माफ केले. साखर कारखान्यावरील कायमचे दुखणे दूर केलं. कांदा उत्पादकांना मदत केली. कांदा निर्यातबंदी उठवली. समृद्धी महामार्गाचा लोकांना फायदा होत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा विरोध घेऊ शकत नाही. लाडकी बहीण योजना केली ते काही चुकीचं केलं नाही. पाच वर्षे योजना चालू ठेवायची आहे. सगळ्यांना न्याय द्यायचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT