Raju Shetti  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार

Swabhimani Shetkari Sanghatana: राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे.

 गोपाल हागे

Washim News: राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मात्र आता सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारच्या धोरणामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला. कर्जमाफीसाठी राज्यभर शेतकऱ्यांना संघटित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठा लढा उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

वाशीम जिल्ह्यातील देपूळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्जमाफी, पीकविमा, सोयाबीन हमीभाव व नुकसानभरपाई आदी मुद्यांवर संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात जाहीर सभा गुरुवारी (ता. ३) रात्री घेण्यात आली. सभेला संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, प्रा. प्रकाश पोफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना शेट्टी यांनी शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आपला जो विश्‍वासघात झाला आहे तो मुकाट्याने सहन करायचा नाही. ज्यांनी आपल्याला फसवले त्यांना आता तुडवायला कमी करू नका, असे आवाहन केले. वाशीम जिल्ह्यात कारंजा येथील सभेत महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीन पक्षांच्या वतीने बोलताना, जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, असे सांगितले होते. मग सरकारने हा सातबारा कोरा का केला नाही, या प्रश्‍नाचे उत्तर सरकारने द्यायला पाहिजे.

तुम्ही डोळे झाकून सरकारला मते दिली आहेत. पण ज्यांना मते दिली त्यांनी किमान रस्ते तरी दुरुस्त करावेत. वाशीम ते देपूळ हे १० किलोमीटर अंतर यायला एक तास लागला, असे तुमचे रस्ते आहेत. तुम्ही २० वर्षे त्यांनाच मते देत आहेत. निवडून दिले तरी त्यांचे गुण बदलत नाहीत. तुम्ही बटण दाबताना डोके ठिकाणावर ठेवायला हवे होते, असेही त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून म्हटले. कर्जमाफी, शेतीमालाला भाव, अशा विविध मुद्यांवर सरकारकडून तुमची फसवणूक केली जात आहे, असे सांगत त्यांनी आगामी काळात लढ्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. सभेत दामोदर इंगोले, प्रा. पोफळे यांनी मार्गदर्शन केले.

फडणवीसांची क्लिप ऐकवली

कारंजा येथील सभेत बोलताना फडवणीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज पूर्ण माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे भाषणात बोलत असल्याची ऑडिओ क्लिप सभेतील शेतकऱ्यांना ऐकविण्यात आली.

फडणवीसांना जाब विचारा

शेट्टी म्हणाले, की या आठवड्यात मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत. त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT