
Nanded News: पीकविमा कंपनीने लेखी आश्वासन देऊनही दोन वर्षांपासून पीकविम्याचे पैसे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे शिवसेना प्रणीत शेतकरी सेनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या नांदेड येथील कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन आहे.
नांदेड जिल्ह्यात खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी अनेक वेळा निवेदन दिले. आंदोलने केली. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने पडताळणी करून दिल्यानंतर विमा कंपनीने २०२३ च्या दोन लाख शेतकऱ्यांचे अर्ज मान्य केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु कंपनीने घुमजाव करत शेतकऱ्याला विमा देण्यास टाळाटाळ केली. २०२३ च्या साडेसात लाख शेतकऱ्यांना अद्याप कवडीही मिळाली नाही.
यामुळे दहा लाख शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. मार्च अखेरपर्यंत २०२३ चा व २०२४ चा विमा शेतकऱ्यांना दिला नाही तर ३ एप्रिलला पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला होता.
त्यानुसार गुरुवारी सकाळी दहापासून अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे कृषी विभाग व प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान आमदार आनंद पाटील यांच्या मध्यस्थीने पीकविम्याचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात आमदार पाटील यांनी कंपनीने लेखी दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे हा विषय घेऊन जाणार असल्याचे आनंदराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.