Sugar Factory Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sugar Rate : राज्यातील ९६ साखर कारखान्यानी एफआरपी थकवली; साखर आयुक्त विभागाकडून कारवाई होणार का?

Sugar Commissioner Department : साखर आयुक्त विभागाने राज्यातील गळीत हंगाम, साखर उत्पादन तसेच एफआरपी दिलेल्या साखर कारखान्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Sugarcane : राज्यातील साखर कारखान्यांचा उशिरा हंगाम सुरू होऊन महिनाभर आदीचं संपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, साखर आयुक्त विभागाने राज्यातील गळीत हंगाम, साखर उत्पादन तसेच एफआरपी दिलेल्या साखर कारखान्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जवळपास ९६ साखर कारखान्यांनी एफआरपी थकवल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील २०० हून अधिक साखर कारखान्यांना गाळप करण्यास परवानगी देण्यात आली होती.

दोन महिन्यांतील हंगामात गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षीचा हंगाम मागे पडला आहे. त्याचबरोबर कारखान्यांचे गाळप पूर्ण होऊन बंद होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. आतापर्यंत केवळ ९ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते. यावर्षी २५ कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये २१ कारखाने केवळ सोलापूर विभागातील आहेत.

एकूण ४९६ लाख १९ हजार मेट्रिक टनांइतके ऊस गाळप कारखान्यांनी पूर्ण केले. साखर कारखान्यांनी १५ जानेवारीअखेर गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीच्या १६ हजार ५७७ कोटींपैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ हजार ९८२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी साखर विभागाच्या केंद्रीय मुख्य संचालकांना अहवाल पाठवला आहे. या अहवालात मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील साखर कारखान्यांनी ८४.३५ टक्क्यांइतकी एफआरपी जमा झाली आहे. २०० साखर कारखान्यांमधील ६६ साखर कारखान्यांनी एफआरपीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. तर ३७ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के रक्कम दिली आहे. आणखी ३७ कारखान्यानी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली आहे. तर ५९ कारखान्यांनी शून्य ते ५९ टक्के एफआरपी दिली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनेक साखर कारखान्यांची एफआरपी थकीत आहे. यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर काय कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सोलापूर विभागातील सर्वाधिक साखर कारखाने बंद

सोलापूर विभागात सर्वाधिक ४५ कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती. त्यापैकी २५ कारखाने फेब्रुवारीमध्येच बंद झाले. ऊस कमी होत असल्याने पुढील वर्षीच्या गाळप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच वर्षी कारखाने लवकर बंद होत आहेत. मागील १५ दिवसांत राज्यातील २५ कारखाने बंद झाले आहेत. त्यामध्ये सोलापूरनंतर नांदेड विभागातील चार कारखाने बंद झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT