Pune Water Crisis: वाढत्या उष्णतेने पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ
Water Scarcity: पुणे जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने खालावली असून धरणांवरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी, जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे, तर सात धरणे उपयुक्त (चल) पाणीसाठा संपल्याने कोरडी पडली आहेत.