Amravati News : कॉटनबेल्ट अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यात त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची साखळी उभी राहिली. मात्र यंदाच्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव तसेच मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापूस भिजला. त्याचा फटका बसत जिल्ह्यातील ७० टक्के जिनिंग उद्योग बंद पडल्याचे वास्तव आहे.
कापसाचा हमीभाव ७०२० रुपये आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाला हा दर मिळत असताना हलक्या प्रतीच्या कापसाची खरेदी मात्र ६००० ते ६८०० रुपयांनी होत आहे. कमी दर मिळण्यामागे कापसाचा रंग बदल त्यासोबतच इतरही बदलते परिणाम अशी कारणे दिली जात आहेत.
अशातच काही भागात बोंडअळीच्या परिणामी कापसाच्या कवड्या झाल्या. या एकूणच परिस्थितीमुळे कापूस बाजारात अस्थिरता असल्याचे चित्र आहे. यापूर्वीच्या काही वर्षात शेतकऱ्यांना दहा हजारांपेक्षा अधिकचा भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही चांगला परतावा या पिकातून मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याच कारणामुळे कापसाच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. केवळ आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी याकरिताच कापूस विक्रीवर भर देण्यात येत आहे.
या साऱ्यांच्या परिणामी बाजारात आवक कमी असल्याने त्याचा फटका जिनींग व्यवसायाला बसला आहे. अमरावती, दर्यापूर, वरुड या भागांत सर्वाधिक जिनींग आहेत. परंतु कापूस प्रतवारीच्या कारणामुळे आवक कमी झाल्याने यातील ७० टक्के जिनींग बंद पडले आहेत. जिनींग बंद असल्याने या ठिकाणच्या कामगारांवर देखील रोजगारासाठी भटकंतीची वेळ आली आहे.
कापसाचे भाव ६००० ते ६८०० रुपये
कापूस गाठ प्रती खंडी ५५ हजार रुपये.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.