Shaktipeeth Highway Revised Alignment News Updates: नागपूर- गोवा (पवनार ते पत्रादेवी) दरम्यानच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) सुधारित आखणीस सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मूळ मंजूर आखणीपैकी वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवण्यात आली आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे..तसेत सातारा जिल्ह्यामधील आखणी नव्याने अंतर्भूत करुन महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंतच्या सुधारीत आखणीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या महामार्गाची लांबी ८०२ किलोमीटरवरून आता ८५६ किलोमीटरपर्यंत वाढली आहे. याचाच अर्थ या महामार्गाची लांबी ५४ किलोमीटरने वाढली आहे. हा महामार्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह आता सातारा जिल्ह्यातूनही जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. .पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) दरम्यानच्या ८०२.५९२ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीस ७ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. सदर आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली सुरुवातीची अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले. कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली. त्यानंतर २८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली. तसेच उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते..Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग तत्काळ रद्द करा.संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय संबंधित मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करुन तुलनात्मक दृष्ट्या सर्वाधिक योग्य अशा सुधारीत आखणीला अंतिम स्वरुप दिले आहे..Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात उठाव करू.१८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणारसदर प्रस्तावानुसार महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून आणि ४० तालुक्यांमधून जात आहे. सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर यांच्यासह २१ धार्मिक स्थळे जोडली जातील. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः ८ तासांवर येणे अपेक्षित असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे..या महामार्गाची सुधारीत आखणी अंतिम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने निर्णय जारी केला आहे. या प्रकल्पावर एकूण खर्च १ लाख कोटी रुपये होणार आहे. सुरुवातीला सुमारे ८० हजार कोटींच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला होता. या महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.