Krishi Seva Kendra  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : अनियमितता आढळल्याने ३० कृषी केंद्रांचे परवाने कायम रद्द

Krishi Seva Kendra : कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांत अनियमितता आढळून आल्या.

Team Agrowon

Chandrapur News : कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांत अनियमितता आढळून आल्या. याची दखल घेत तीस कृषी केंद्राचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. दोन निलंबित तर पंचवीसवर कृषी केंद्रांना कृषी विभागाने ताकीद दिली. कृषी विभागाच्या या कारवाईने कृषी केंद्रधारकांचे धाबे दणाणले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात बियाण्यांचे ११४०, रासायनिक खतांचे १२१८ आणि कीटकनाशकांची एक हजारांवर केंद्रे आहेत. जिल्हा परिषद कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून एप्रिल ते मार्च या कालावधीत कृषी केंद्रांची नियमित तपासणी केली जाते.

पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणीचे हे काम चालते. तपासणीदरम्यान अनेक कृषी केंद्रांत अनियमितता आढळून आली.

त्यात प्रामुख्याने विक्री परवान्यात उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, रजिस्टवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करीत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर स्वाक्षरी नसणे, पास मशीनवर विक्री नसणे, अहवाल सादर न करणे, शेतकऱ्यांची देयके न देणे असे गंभीर प्रकार तपासणीत आढळून आले. या प्रकारानंतर जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अनियमितता आढळून आलेल्या कृषी केंद्रांची सुनावणी घेण्यात आली.

या सुनावणीत जिल्ह्यातील तीस कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. त्यात बियाणे विक्री करणाऱ्या १४ कृषी केंद्रांचा समावेश आहे. दोन परवाने निलंबित करण्यात आले, तर पाच कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली. कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या सात कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले.

खताची विक्री करणाऱ्या नऊ केंद्राचे परवाने रद्द तर २० कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. शेतीचा हंगाम चालू होण्यास अजून काही महिने शिल्लक आहेत. हंगामात मोठ्या प्रमाणावर कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर परवाने कायमचे रद्द केले. काहींना ताकीद दिली. यामुळे कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक बोढे आणि मोहीम अधिकारी कटरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT