Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सांगली जिल्हा बँकेचे १५१ कोटींचे कर्जवाटप

Rabi Sowing : रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदा पावसाची दडी आणि पाण्याची कमतरता असली तरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास गती आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने डिसेंबरअखेर ८ हजार १९४ शेतकऱ्यांना १५१ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंक कर्ज वाटपात आघाडीवर आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. यंदा पावसाची दडी आणि पाण्याची कमतरता असली तरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची मागणी होऊ लागली आहे. राष्ट्रीय आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पीक कर्जाची मागणी होत आहे.

मात्र जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्जवाटप केले जाते. जिल्हा बॅंकेतून ३२ हजार २१९ शेतकऱ्यांना ६९२ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. ऑक्टोबरअखेर जिल्हा बॅंकेकडून ४ हजार २६६ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३८ लाखांचे कर्जवाटप केले होते.

दरम्यान, जिल्हा बँकेने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यास पुढाकार घेतला असल्याचे चित्र आहे.

जिल्हा बॅंकेने ८ हजार १९४ शेतकऱ्यांनी २ हजार ८५८ हेक्टरवरील पिकांना १५१ कोटी ६१ लाख ६२ हजार रुपयांचे कर्जवितरण केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी २१.९० आहे.

जिल्हा बँकेच्या सर्व शाखांकडे अद्याप कर्ज मागणीचे प्रस्ताव आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेकडून यंदाही रब्बी हंगामाचे कर्ज वितरण करण्यास अग्रेसर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT