Eknath Shinde Statement On Uddhav Thackeray: देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे. देशामध्ये कायदा, सुव्यवस्था बिघडली पाहिजे, यासाठी लोकांना भडकवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल? कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल? लोकं रस्त्यावर येऊन आंदोलने कशी करतील? अशा भ्रमात ही सगळी मंडळी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. .बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी 'उबाठा'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी कितीही जरी हिंदुत्वाचा आव आणला तरी त्यांचे हिंदुत्व बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर ते बसले आहेत. ज्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं, ज्यांनी ३७० कलम हटवले, ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न साकार केले त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय? असा सवाल शिंदेंनी केला. .Amit Shah Statement On Eknath Shinde: शिवसेना शिंदेंचीच, आता गट राहिलेला नाही, अमित शहांचा ठाकरेंवर निशाणा.आपला देश आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. जवळपास ८० लाख लोकांना अन्नधान्य देण्याचे काम सुरु आहे. ३२ कोटी लोकांना दारिद्र रेषेतून बाहेर आणण्यात आले. इतर देशांत अराजकता पसरली. पण आपल्या देशात, राज्यात परिस्थिती उलटी आहे. म्हणूनच २०१४ पूर्वी युपीए काँग्रेस सरकारच्या काळात झालेले भ्रष्टाचार, मोठे घोटाळे या देशातील युवकांनी पाहिले आहेत. २०१४ नंतर देशातील युवा वर्ग पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहे. नोकऱ्या, हाताला काम मिळत असल्याचे युवक पाहात आहेत, असे त्यांनी नमूद केले. .Eknath Shinde Shiv Sena: ठाकरेंच्या ६ फुटीर खासदारांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी, शिंदेंची घोषणा.पंतप्रधान मोदी यांनी अनेक निर्णय घेतले. युवक, गरीब, शेतकरी, महिला या वर्गांना न्याय देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. .केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळणार?दिल्लीला चाललाय, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले की, एनडीए सोबत आमची विचारधारेने जोडलेली युती आहे. ही आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी झालेली युती नाही. शिवसेना कधीही बार्गेनिंग करत नाही आणि करणारही नाही. आम्ही एनडीएला मजबूत करण्याचे काम करु, असे शिंदे म्हणाले..'त्या पत्राला खासदारांनी केराची टोपली दाखवली'ठाकरेंच्या शिवसेनेने सहा फुटीर खासदारांना पत्र लिहिले आहे. तुम्हाला मूळ पक्षाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचे त्यातून स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, त्या पत्राला आमच्या खासदारांनी केराची टोपली दाखवली. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीत नियमाप्रमाणे दोन तृतीयांश बहुमताला महत्त्व आहे. लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन सहा खासदारांनी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. यामुळे त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही, असा दावा त्यांनी केला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.