Electricity Connection Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection Issue : ‘जलजीवन’च्या १०३ योजनांना मिळेना वीजजोडणी

Jal Jeevan Mission : नाशिक जिल्ह्यात टंचाईची दहाकता लक्षात घेऊन जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्याचे आदेश आहेत.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात टंचाईची दहाकता लक्षात घेऊन जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६१३ योजना पूर्ण केल्या. मात्र, वीजबिल न भरल्यामुळे जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांचे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही जिल्ह्यातील ११० योजना सुरू नसल्याचे समोर आले आहे. यातही, प्रत्यक्षात १०३ ठिकाणी वीजजोडणीच नसल्याने पाणीपुरवठा करता येत नाही.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात १२२२ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी ३१ मार्चपर्यंत जवळपास ६१३ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात या योजना पूर्ण होऊनही केवळ ५०३ ठिकाणीच नागरिकांना योजनांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. उर्वरित ११० ठिकाणी वीजजोडण्या नसल्यामुळे उद्भव विहिरींना पाणी असूनही नागरिकांना त्याचा पुरवठा करता येत नसल्याचे चित्र आहे.

ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून त्यांचे थकित वीजबिल भरण्यास परवानगी दिली. मात्र, या ग्रामपंचायतींनी आधीच या निधीतून विकास आराखडे तयार केले असल्यामुळे निधी खर्चात बदल करायचा असल्यास त्या आराखड्यातील काम बदल करणे गरजेचे आहे. विकास आराखड्यातील बदल करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत.

त्यामुळे आराखड्यातील काम बदलाचे प्रस्ताव तयार करणे, त्याला ग्रामसभेची, पंचायत समितीची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे या कामामध्ये बराच वेळ जात असल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या आराखड्यातील कामांचे बदल होऊ शकलेले नाहीत. जानेवारीनंतर जिल्हा परिषदेला जवळपास ६१ कोटींचा बंधित निधी आलेला आहे.

यामुळे या निधीतून थकित वीजबिल भरणा करता येणे शक्य आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायती थकित वीजबिल भरण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील ६१३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण होऊनही केवळ ५०३ योजनांद्वारे संबंधित गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, उर्वरित ११० गावांl योजनांना वीजजोडणी नसल्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकत नाही.

जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या १२२२ योजनांपैकी ६१३ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. या योजनांपैकी ५०३ योजनांमधून पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. उर्वरित ११० योजनांना अद्याप वीजजोडणी मिळाली नसल्याने योजना सुरू झालेल्या नाहीत. याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल. सर्व योजनांमधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाईल.
संदीप सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT