ताज्या बातम्या

Agriculture : शेतीशी निगडित उद्योगांच्या समस्या जाणून घेऊ : कृषिमंत्री

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : ‘‘शेती (Agriculture) हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा (Modern Agriculture Technology) वापर होणे आवश्यक आहे. यासाठी बीज उद्योग, खत कंपनी, तसेच शेतीशी निगडित सर्व उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. नव तंत्रज्ञानाच्या वापरातून बळीराजाला सक्षम करणे गरजेचे आहे,’’ असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितले.

फर्टिलायझर, सीड्स व मायक्रोन्यूट्रियंट्स संस्थेतर्फे येथे नुकत्याच आयोजित बैठकीत सत्तार बोलत होते. या वेळी राघवेंद्र जोशी, अजित मुळे, आशुतोष बडवे उपस्थित होते. सत्तार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. बळीराजाने शेतीसोबतच जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे. गटशेती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय प्रारंभ मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्रावाडी येथे होईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

Cooperative Election : लोकसभा झाली आता गावपातळीवरचं राजकारण तापणारं, ९१ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

Krushi Vasant Abhiyan : ‘कृषी वसंत’ अभियानाला अकोला जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू

Indrayani River : पुन्हा फेसाळली इंद्रायणी नदी!, नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Sericulture Farming : वाशीम जिल्ह्यात रेशीम शेतीकडे वाढतोय कल

SCROLL FOR NEXT