Girna Dam Agrowon
ताज्या बातम्या

Girna Dam : गिरणा धरणातील आवक वाढू लागली

Girna Dam Water Level Capacity : पावसामुळे धरणाच्या साठ्यात सात टक्क्यांनी वाढून हा जलसाठा आता २६ टक्क्यांवर गेला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील पाण्याची आवक मागील तीन-चार दिवसात वाढली आहे. यामुळे धरणातील जलसाठा वाढत असून, गिरणा पट्ट्याला दिलासा मिळाला आहे.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र पाच दिवसांत मालेगाव भागात झालेल्या पावसामुळे धरणाच्या साठ्यात सात टक्क्यांनी वाढून हा जलसाठा आता २६ टक्क्यांवर गेला आहे.

पाण्याची अशीच आवक राहिल्यास आणखी तीन, चार दिवसांत तो ३० टक्क्यांवर जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरणात तीस टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाल्यास वर्षभराची पाण्याची चिंता मिटते, असा अनुमान आहे. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदा पाच दिवसांत साठ्यात वाढ झाली आहे.

काही भागात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. चाळीसगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी अजून पाहिजे, तसा पाऊस झाला नाही. पावसाचे दोन महिने संपत आले तरी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जेमतेम पावसामुळे पेरण्या आटोपल्या असल्या तरी नदी-नाले मात्र अद्यापही कोरडेठाक आहेत. तालुक्यात भर पावसाळ्यात १२ गावांमध्ये टँकर सुरूच आहेत. त्यातच निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागवणारे गिरणा धरण सलग चार वर्षांपासून १०० टक्के भरत असल्याने गिरणा पट्ट्यात आबादानी असली तरी यंदा मात्र जुलै संपत आला तरी धरणातील साठा चिंताजनक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणेतील जलसाठा हा १९ टक्क्यांवर स्थिरावला होता. गत आठवड्यात मालेगाव भागात झालेल्या पावसामुळे दोन टक्क्यांनी वाढून २१ टक्क्यांवर पोहचला होता.

गतवर्षी हाच साठा ९० टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे यंदा सलग पाचव्यांदा हे धरण १०० टक्के भरणार की नाही, याची चिंता असताना मालेगाव भागातील चणकापूर, ठेंगोडा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गेल्या तीन, चार दिवसांत धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. गिरणातील जलसाठा हा २१ टक्क्यांवरून २६ टक्के झाला आहे. आणखी दोन, तीन दिवसांत हा जलसाठा ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) येथील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तसेच तापीवरील सुलवाडे (जि. धुळे) येथील बॅरेज, सारंगखेडा व प्रकाशा (ता. शहादा, जि. नंदुरबार) बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर प्रकल्पाचा जलसाठाही काहीसा वाढला आहे. नंदुरबारमधील देहली, दरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

जिल्ह्याची तहान भागणार ?

गिरणा धरणावर जिल्ह्यातील हजारो हेक्टर सिंचनासह शेकडो पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. गत वर्षात धरणातून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी एकूण ५ आवर्तने सोडण्यात आली होती. धरणात ३० टक्क्यांहून अधिक साठा झाल्यास पिण्याची पाण्याची वर्षभराची चिंता मिटते, असे सांगितले जाते. गेल्या पाच, सहा दिवसांत धरणात सात टक्क्यांनी वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT