E Peek Pahani  Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : ई-पीक नोंदणीत अडचणीच अडचणी

Kharif Season : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव या पाचही जिल्ह्यांत ई-पीकनोंदणी करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव या पाचही जिल्ह्यांत ई-पीकनोंदणी करण्यात शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.

मुदत संपायला आली असताना आपली ई-पीकनोंदणी करून घेण्यासाठी शेतकरी आर्थिक भुरदंडासह सर्वच कसरत करत आहेत. वेळेत की पीकनोंदणी झाली नाही तर आपलं कसं असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

आपल्या पिकांची नोंद आपल्यालाच करता यावी म्हणून ई-पीक नोंदणी करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली. संधी चांगली असली तरी अनेक शेतकऱ्यांकडे या ई-पीक नोंदणीसाठी आवश्यक अँड्रॉइड मोबाइलच नाहीत. अनेकांच्या गावात रेंज नाही. ज्यांनी आधीचे ॲप डाउनलोड केले त्यांचे ॲप चालत नाही. ज्यांनी नवीन ॲप डाउनलोड केले ते चालन्यातही अनेकांकडे अडचणी येतात.

एकाच कुटुंबातील काही मोबाइलमध्ये ॲप चालते तर काही मध्ये चालत नाही. त्यामुळे ई-पीक नोंदणीचा टक्का अजूनही बहुतांश भागात ४०-५० टक्के पुढे सरकलेला दिसत नाही. बीड जिल्ह्यात ५४ टक्के, छत्रपती संभाजीनगर मध्ये ४७ टक्के, तर जालना जिल्ह्यात केवळ २७ टक्के ई-पीक नोंदणी झाली आहे. प्रशासनाकडून ई-पीकपाहणी संदर्भात यंत्रणेला तत्परतेने व गतीने काम करण्याचे सांगितले जात आहे.

मुळात जबाबदारी शेतकऱ्याची असे म्हणून अनेक ठिकाणी याला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांना आपली ई-पीक नोंदणी करावी कशी हे कळत नाही. कुणाकडून करून घेतली तर ती योग्य झाली की नाही ते कळत नाही. त्यामुळे ग्राम पातळीवर तलाठ्यांनी ई-पीकपाहणी केली का असे विचारले तर शेतकऱ्यांकडून आम्ही केली असे उत्तर मिळते.

प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी झाली नसल्याचे या पाहणीच्या ऑनलाइन यादीतून समोर येत आहे. त्यामुळे अडथळे व निर्माण झालेली दरी दूर करून प्रशासनाने वेळेत ई-पीक नोंदणी करण्यासाठी यंत्रणेला गतिमान करावे व प्रसंगी या पीक नोंदणी साठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते आहे.

आमच्या गाव शिवारात चाळीस टक्के लोकांकडे अँड्रॉइड मोबाइलच नाही. त्यामुळे अनेकांची ई-पीकनोंदणी बाकी आहे. वेळेत होईल की नाही कल्पना नाही शेतकरी प्रयत्न करत आहेत.
- गणेश म्हस्के, वरूड, जि. जालना
आमच्याच कुटुंबातील काही मोबाइल मध्ये ई-पीकनोंदणीचे ॲप चालते तर काही मध्ये चालत नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नाही असे शेतकरी जमल तस आपली ई-पीकनोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ती झाली की नाही हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनी तलाठ्याला झाली असे कळविले तरी प्रत्यक्षात ती झाली नसल्याचे अनेक उदाहरणं आहेत.
- गणपतराव चव्हाण, यशवंतवाडी, जि. लातूर
आमच्या गावातील किमान ६० टक्के शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी बाकी आहे गाव शिवारात मोबाइलची रेंजच नसते अनेकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत. शेतकरी प्रयत्न करत आहेत, पण वेळेत होईल असं दिसत नाही.
- निवृत्ती कागदे, लाखेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT