
Pune News : खरीप हंगाम सन २०२३ मध्ये आतापर्यंत २४ हजार ९२० खातेदारांनी २४ हजार ६२८ हेक्टर आर क्षेत्रावर मोबाइल ॲपद्वारे पीकपाहणीच्या नोंदी केल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीकपाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीकपाहणी मोबाइल ॲपद्वारे पीकपाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीकपाहणीची नोंद करावी. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकपाहणीच्या नोंदी केल्या आहेत.
पीकपेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने ई-पीकपाहणी महत्त्वाची असून, माहिती संकलित करताना पारदर्शकता येते. पीकपेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पत पुरवठा सुलभ होतो.
पीकविमा आणि पीकपाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
त्यामुळे उर्वरित खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाइल ॲपद्वारे पीकपाहणीची उत्स्फूतपणे नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.