Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

शेतकऱ्याला केवळ सहानुभूती नको : संभाजीराजे

टीम ॲग्रोवन

नाशिक : ‘‘शेतकरी हा सध्या अस्मानी संकटांनी ग्रासलेला आहे. शेतकऱ्याच्या हिमतीला आणि सहनशीलतेला नक्कीच मुजरा केला पाहिजे. कारण शेतकरी कधीच आलेल्या संकटाला भीत नाही. मात्र या शेतकऱ्याला केवळ सहानुभूती देऊन चालणार नाही. तर पाठीमागे सर्वच बाजूंनी खंबीर उभे राहण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) व शाहू महाराजांचे (Shahu Maharaj) विचार या कामी सर्वांना मार्गदर्शक ठरतील,’’ असे प्रतिपादन माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सलादे बाबा ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील ७५ शेतकऱ्यांचा अमृतमहोत्सवी सहस्रचंद्रदर्शन सोहळा वडनेर भैरव (ता. चांदवड) येथे झाला. अध्यक्षस्थानी कृषी उद्योजक गौतम पाटील हे होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अमोल भालेराव, रामभाऊ भालेराव, एन. डी. माळी, पोपटराव पाचोरकर, नंदू जंगम, प्रमोद माळी, राजाभाऊ भालेराव, अनिल पवार, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, ‘‘वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृती नाही, तर भारताने जगाला ‘मातृ पितृ देवो भव’ ही संकल्पना राबविली आहे. देवा इतकेच आई-वडिलांना महत्त्व आपल्या संस्कृतीने दिले आहे.’’ डॉ. कैलास सलादे, निकिता सलादे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज सगर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT