Solapur Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाअभावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Agriculture News : पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात खते, बियाण्यांची सुमारे शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे.

Team Agrowon

Dhule News : पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात खते, बियाण्यांची सुमारे शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांसह व्यावसायिक कमालीचे चिंतेत असून, गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी क्षेत्राशी निगडित बाजारपेठेत शांतता आहे. कृषी निविष्ठांचा साठा आहे, परंतु उठाव नसल्याने व्यावसायिक चिंताक्रांत असून, यंदाचा खरीप हंगाम पुढे ढकलला जात असल्याचे चित्र आहे.

जून सरण्यास अवघा आठवडा शिल्लक आहे. तरीही वरुणराजाची कृपादृष्टी नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत, तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिके वाचविण्याची धडपड सुरू आहे. परिणामी, खते, बियाणे, कीटकनाशके बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विविध व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पीक वाचविण्याची धडपड

पेरण्या वेळेत झाल्या नाहीत तर उडीद, मुगाच्या पेरणीवर परिणामाची शक्यता असेल. मका, बाजरी, सोयाबीनची पेरणी विलंबाने होईल. त्याचा कितपत फायदा होईल, असा शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न असेल. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.

ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केलेली आहे, त्यांची पावसाच्या विलंबामुळे आहे ते पेरणीतील पीक वाचविण्याची धडपड सुरू आहे. तापमानात वाढ, विजेचा पुरवठा सुरळीत नसल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत आहे.

पावसाच्या विलंबामुळे असाही खरिपाचा हंगाम पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे पुढील स्थितीशी कसा सामना करावा या विवंचनेत हे घटक आहेत.

विजेसह डीपीचा प्रश्‍न

पावसाच्या विलंबामुळे टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. भूजल पातळी खालावत असल्याने आणि पाणी असलेल्या स्रोतांतून उपसा करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारीचा वापर वाढू लागला आहे. अशात अधिक भारामुळे डीपी जळण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. परिणामी, पेरणी केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक कसरत करावी लागत आहे.

अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणापर्यंत कृषी निविष्ठांचा साठा करून ठेवण्यात आला आहे; परंतु त्याला उठाव नाही.

खते आणि कीटकनाशके बाजारात कमालीची शांतता दिसते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राशी निगडित बाजारपेठेत चलनवलनच होत नसल्याने व्यावसायिकही शेतकऱ्यांप्रमाणे वरुणराजाला बसरण्याचे साकडे घालत आहेत.

धुळे जिल्ह्याचे पेरणी उद्दिष्ट

जिल्ह्यात यंदाच्या खरिपात तीन लाख ७९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट आहे. पैकी सरासरी ४९ हजार हेक्टरवर ओलिताखालील कपाशीची लागवड झाली आहे. इतर पिकांची फारशी लागवड होऊ शकलेली नाही.

पेरणीसाठी किमान सरासरी ६४ मिलिमीटर ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र समतोल पावसाची गरज असेल. जूनअखेरपर्यंत खरिपाची पेरणी होत असते. तोपर्यंत दुबार पेरणीचे संकट नाही, असा कृषी यंत्रणेचा दावा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT