
Pune News : रब्बी कांद्याचे आगार असलेल्या टाकळीहाजीच्या बेट भागामध्ये कांदा लागवडीच्या कामाची लगबग सुरू आहे. मात्र लागवडीसाठी मजुरांचा मात्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यांमधून मजूर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी कसरत करावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
टाकळी हाजी बरोबरच बेट भागातील जांबूत, आमदाबाद, कवठे येमाई, वडनेर, पिंपरखेड या परिसरातील गावांमध्ये देखील कांद्याची लागवड वाढली आहे. यावर्षी कांद्याला चांगले दर मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे वाढला आहे.
कांद्याचे क्षेत्र आणि उत्पादन वाढीमुळे कांद्याची साठवणुकीसाठी आधुनिक कांदा चाळी शेतकऱ्यांनी उभारल्या आहेत. या चाळीमुळे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे कांदा साठवता आला व जादा बाजार भाव आल्यानंतर हा कांदा बाजारात विकून चांगल्या प्रकारे नफा देखील होत आहे.अजूनही शेतकरी नवीन कांदा चाळी बांधण्याकडे कल वाढला आहे.
कांदा लागवडीसाठी ठरावीकच भागात अनुभवी मजूर मिळतात. यामध्ये जुन्नर, आंबेगाव तसेच माळशेज घाटाखालील गावातील मजूर कांदा लागवडीचे काम करतात. या मजुरांना आणण्यासाठी मोठे शेतकरी स्वतःची गाडी पाठवून घेऊन येतात. त्यांना राहण्याची, खाण्याची, नाष्ट्याची सर्व व्यवस्था शेतकऱ्याकडे करावी लागते. त्याचबरोबर त्यांना ४०० ते ५०० रुपये प्रति दिवस याप्रमाणे हजेरी द्यावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्च वाढत आहे.
कांदा लागवडीसाठी वाफे तयार करणे कांद्यांच्या रोपांची बांधणी करणे, वाहतूक करणे व लागवड करणे असे वीस ते पंचवीस मजुरांची आवश्यकता असते. स्थानिक पातळीवर मजूर उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जसे मजूर उपलब्ध होतील त्याप्रमाणे कांदा लागवडीचे काम करावे लागत असल्याने लागवडीसाठी विलंब होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.