
Nagpur News: शेतकऱ्यांमध्ये प्रयोगशीलतेला चालना मिळावी, तसेच त्यांच्या बांधावरील प्रयोगाचे मूल्यांकन होऊन त्याला राष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळण्याच्या उद्देशाने विविध श्रेणीत त्यांना गौरविले जात होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) माध्यमातून १९५६ पासून सुरू असलेल्या या परंपरेला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका आदेशान्वये खीळ घालण्यात आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होतो. या सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह आयसीएआर महासंचालकांची उपस्थिती असते. या कार्यक्रमात देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना गौरविण्याचा प्रघात आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कार, एन.जी. रंगा फार्मर अवॉर्ड, जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार, हलधर ऑरगॅनिक फार्मर अॅवॉर्ड त्यासोबतच कृषी विस्तार क्षेत्रात काम करणाऱ्या चौधरी चरणसिंग एक्सलन्स इन जर्नालिझम अशा मान्यवरांच्या नावाने पुरस्कार दिले जात होते.
१९५६ मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्याची घोषणा झाली. त्यानंतर १९९९ मध्ये या पुरस्काराचे पुनरावलोकन करून त्याचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची पुरस्कारार्थी म्हणून निवड होत होती. सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख असे या पुरसकराचे स्वरूप होते. २०२०-२१ या वर्षापर्यंत पुरस्कार देण्यात सातत्य असताना २०२२ पासून पुरस्कार देणे बंद करण्यात आले. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संचालकांचा ‘नो रिस्पॉन्स’
परिषदेचे महासंचालक डॉ. एम.एल. जाट यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.