Agriculture Irrigation : शेतीसाठी ‘धनपूर’च्या पाण्याची प्रतीक्षा

Canal Irrigation : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर (ता.तळोदा) धरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील २७२ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही तहानलेलेच राहिले आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर (ता.तळोदा) धरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील २७२ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही तहानलेलेच राहिले आहे. बोरद (ता.तळोदा) व परिसरातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते.

प्रत्यक्षात मात्र आजघडीला मोजक्याच गावांना या धरणाचा लाभ होताना दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी १ जुलै १९९७ ला नंदुरबार जिल्हानिर्मितीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारेमंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित असताना स्वर्गीय पी. के.अण्णा पाटील यांनी धरपूर धरणाचा प्रस्ताव मांडला होता.

पी.के.अण्णा यांनी या विषयाला चालना दिली होती. जून २०१७ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाली. हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कळमसरा, धनपूर, सिलिंगपूर, खर्डी लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छो. धनपूर, राणीपूर इत्यादी गावांतील साधारणतः २७२ हेक्टर शेतजमीनही ओलिताखाली येणार हे स्पष्ट झाले होते. या परिसरातील शेती बागायती होणार आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : सिंचनासाठी सहा धरणांतून ४,७४२ क्युसेक विसर्ग

त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखी होईल व त्यांच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ होईल हे ठासून लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते. परंतु मोठा कालावधी लोटला असून, सर्व किंवा अपेक्षित शेतांपर्यंत पाणी पोचलेच नाही. हा परिसर पूर्णपणे आदिवासी भागााचा आहे. आदिवासी बंधू धरणामुळे समृद्ध होईल व उत्पन्नवाढ होईल, तो आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देईल, अशीही अपेक्षा होती. पण हा उद्देश यशस्वी झाला नाही.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ‘गिरणा’तून तिसऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा

कूपनलिकांना लाभ

धरणाची लांबी सुमारे ४२२ मीटर असून, उंची २०.१८ मीटर, तर खोली १६० मीटर आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात धरणाचे पाणी निझरा नदीत सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढणार, असे सांगण्यात आले आणि प्रत्यक्षात धरणामुळे परिसरातील काही कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत बरीचशी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. असे असले तरी बरीच शेतजमीन अजूनही तहानलेलीच आहे.

२७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

याबाबत स्वर्गीय कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समितीतर्फे पाटचारीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; परंतु पाटचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे धरणाच्या साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून जमिनीत जेवढे पाणी मुरते, तेवढ्याच पाण्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कूपनलिकांच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकांची तहान भागवावी लागत आहे. पाटचारी केली तर ठरल्याप्रमाणे २७२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार हे मात्र तेवढेच खरे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com