Agriculture Irrigation : ‘गिरणा’तून तिसऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा

Girna Dam Irrigation : गिरणा पट्ट्यात उष्णतेच्या लाटेत पिकांची होरपळ होत आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून नदीत पाणी केव्हा सोडले जाईल, याची प्रतीक्षा आहे.
Girna Dam
Girna DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात उष्णतेच्या लाटेत पिकांची होरपळ होत आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून नदीत पाणी केव्हा सोडले जाईल, याची प्रतीक्षा आहे. धरणातून नदीत दोन वेळेस आवर्तन देण्यात आले आहे. तिसऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे.

गिरणापट्टा पाण्यासाठी कासावीस झाला आहे. त्यामुळे सर्वाचे लक्ष गिरणा धरणातून केव्हा आवर्तन सोडण्यात येते याकडे लागले आहे. निम्मा जळगाव जिल्ह्याची पाण्याची तहान गिरणा धरणावर अवलंबून आहे. यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे.

धरणातून रब्बीसह, उद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला होता. धरणातून तिसरे आवर्तन केव्हा सोडण्यात येईल, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे. गिरणा पट्ट्यात सध्या काही भागात टंचाई जाणवत आहे.

Girna Dam
Agriculture Irrigation : ‘त्या’ १४ गावांना मिळणार खडकपूर्णाचे पाणी

कानळदापर्यंत येते पाणी

गिरणा धरणातून २००० क्युसेकने पाणी सोडण्यात येते. ते जळगाव तालुक्यातील कानळदापर्यंत पोचल्यानंतर आवर्तंन बंद केले जाते. गिरणा काठावरील गावांना मोठा दिलासा मिळतो. सद्य:स्थितीला काठावरील गावांना पुढे टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

पाचोरा, भडगाव व अन्य शहरांसह नदीकाठची गावे गिरणा नदीवर अवलंबून आहेत. चांगल्या पावसामुळे गिरणा नदी डिसेंबरपर्यंत प्रवाही होती. पण पाणीउपसा अधिक आहे. उष्णतेत पाणी मागणी अधिक असून, टंचाई तयार होईल.

धरणात ३२ टक्के पाणीसाठा

गिरणा धरणात सद्य:स्थितीला ३२ टक्के एवढा पाणीसाठा आहे. हा जिवंत पाणीसाठा सोडून ३००० हजार दशलक्ष घनफूट एवढा मृत साठा आहे. धरणाची साठवण क्षमता 18 टीएमसी आहे. एका आवर्तनासाठी सुमारे १ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी आवश्यक असते.

Girna Dam
Agriculture Irrigation : सिंचनासाठी सहा धरणांतून ४,७४२ क्युसेक विसर्ग

चौथे आवर्तन मे महिन्यात

यंदा गिरणा धरणातून रब्बीसह न बीगर सिंचनासाठीदेखील आवर्तन सोडण्यात आले आहेत. नदीत टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत दोन आवर्तन सोडण्यात आलेले आहेत. तिसरे आवर्तन या महिन्यात सोडण्यात येणार आहे. मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चौथे आवर्तन सोडले जाईल, अशी शक्यता आहे.

सद्यःस्थितीत धरणात 32 टक्के पाणीसाठा आहे. आवर्तनानंतर जलसाठा कमी होतो. पावसाळा लांबल्यास जूनमध्येही पाचवे आवर्तन सुटू शकते. गिरणा धरणावरील योजनेवर चाळीसगाव नगरपरिषद, जळगाव महापालिका, नांदगाव व ५६ खेडे व दहिवाळ व २५ गावांची योजना आहे. याशिवाय भडगाव, पाचोरा १७५ योजना अवलंबून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com