Agriculture Irrigation : ‘त्या’ १४ गावांना मिळणार खडकपूर्णाचे पाणी

Kadakpurna Project : पाण्याच्या मागणीसाठी शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. प्रशासनाने या मुद्याचे गांभीर्य ओळखत आता ‘त्या’ १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Buldana News : पाण्याच्या मागणीसाठी शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. प्रशासनाने या मुद्याचे गांभीर्य ओळखत आता ‘त्या’ १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे मंगळवारी (ता. ८) पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई निवारण बैठक झाली. त्या वेळी हे जाहीर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : उजनी धरणातून शेतीसाठी ५०० क्युसेक पाणी सोडले

पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा, जनावरांसाठी चारापाणी, विहीर अधिग्रहण, जलसंधारणाचे काम, सिमेंट बंधारे बांधकाम, भूजल पाणीपातळी, राष्ट्रीय पेयजल योजना, टॅंकरने पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, नळ जोडणी, हर घर जल, जलजीवन मिशन, खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना पाणी उपलब्ध करणे यासह विविध विषयांचा आढावा घेतला.

प्रकल्पातील पाणीसाठ्याचे नियोजन करावे, पिण्याचे पाणी नियोजनावर विशेष लक्ष द्यावे, दरवर्षी टंचाई असलेल्या गावांना जलसंधारणाच्या कामांमध्ये प्राधान्य द्यावे, टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये बोअरवेलचे काम काम पूर्ण करावे, पाणीपुरवठा योजना ताबडतोब पूर्ण कराव्यात.

जलजीवन मिशनच्या कामांचा दर्जा राखला जाईल याची दक्षता घ्यावी. या कामांची नियमित तपासणी करावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : चणकापूर, पुनंद धरणांतून आवर्तन सोडले

पाणी मिळणार

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मार्च महिन्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

यात अंढेरा, वाकी बुद्रूक, वाकी खुर्द, सेवानगर, पिंप्री आंधळे, शिवणी अरमाळ, नागणगाव, पाडळी शिंदे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, वाघाळा, खैरव या गावांना १६६० हेक्टर सिंचनासाठी ७० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com