
New Delhi News: शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गुरुवारपासून (ता.२९) ओडिशातील पुरी येथून विकसित कृषी संकल्प अभियानास सुरुवात करण्यात आली. हे अभियान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राबविले जाणार आहे.
विविध राज्यांतील सुमारे १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचून त्यांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत या काळात हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान सुमारे २० राज्यांचा प्रवास करणार आहेत.
या दरम्यान ते शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधणार आहेत. या अभियानात एकूण २,१७० पथके सहभागी होणार असून ७०० हून अधिक जिल्हे, ६५,००० गावांत हे अभियान राबविले जाणार आहे.
विविध राज्यांतील शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पीक निवड आणि संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य कार्ड वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. तसेच शेतकऱ्यांना नवकल्पना समजून सांगितल्या जाणार असून संशोधनाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.