Climate Change : सोलापूर जिल्ह्यातील वातावरण बदलाचा शेतीला फटका

Agriculture News : सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील अनुमानानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कांदे, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांची पाचावर धारण बसली आहे. पावसामुळे तूर पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील अनुमानानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

हा पाऊस सर्व भागात नसला तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र राहणार आहे. डाळिंब व द्राक्ष बागांसाठी ढगाळ वातावरण हे अत्यंत घातक आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख हेक्टर तूर पीक आहे. हे पीक सध्या फुलोऱ्यात असून घाटेआळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

Climate Change
Climate Change Organizations : हवामान बदलात महिलांचीच होरपळ अधिक

जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ माळशिरस या तालुक्यांसह शेजारील जत, आटपाडी, विटा दहिवडी येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. माढा, बार्शी, करमाळा, परांडा -भूम, इंदापूर, बारामती, दौंड परिसरात ढगांची निर्मिती झाली तर रिमझिम पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागात पाऊस कमी राहील असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

Climate Change
Climate Change : हवामान बदलासंदर्भात श्रीमंत देश खिशात हात घालणार?

पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

सध्या शेतातील सोयाबिन निघाले असले तरी काही शेतकऱ्यांचे तयार झालेले सोयाबिन शेतकऱ्यांनी सोयाबिन विक्रीस नेले नसून अद्याप वळवण सुरू आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादकांची काढणी सुरू झालेली आहे.

सुरवातीच्या काळात लागण झालेला कांदा कापणी होऊन तयार झालेला आहे. अगोदरच जास्ती पावसामुळे हा कांदा नासण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आता तयार झालेला माल भिजला तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला जाणार आहे.

द्राक्ष बागायतदारांनी भुरीच्या रोगापासून पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकावर तेल्या मर तसेच किडीचे प्रमाण वाढू शकते. १९ प्रकारचे बुरशीजन्य रोग या वातावरणामुळे निर्माण होऊ शकतात.
- डॉ.लालासाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com