
येवला, जि. नाशिक : शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम (Rabi Season) महत्त्वाचा असून सध्या मोठ्या प्रमाणात लागवडीची (Sowing) काम सुरू आहेत. त्यांना सिंचन (Irrigation) करण्यासाठी दिवसा पूर्णवेळ वीज (Daytime Electricity) उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांचे विजेचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, अशा सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या.
येवला मतदासंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (ता. १९) भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार किशोर दराडे, तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुणमामा थोरात, संभाजी पवार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की शेतकऱ्यांचे असलेले विजेचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. शेतकऱ्यांचे वीज जोड तोडण्यात येऊ नयेत, तसेच शेतकऱ्यांनीदेखील शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन टप्प्याटप्प्याने बिल भरावे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.