बुलडाणा ः चिखली आणि बुलडाणा तालुक्यांत परतीच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage)झाले आहे. उभी पिके पाण्यात असल्याने सोयाबीनला (Soybean Crop) कोंब फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने याची भरपाई देण्यासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार श्वेता महाले पाटील (Shweta Mahale Patil) यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे त्यांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्यानंतर काढणीच्या वेळीच सप्टेंबरपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने चिखली आणि बुलडाणा तालुक्यात शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसाने पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कोंब फुटत आहे. उभी पिके सडत आहे. त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार महाले यांनी केली आहे. मागील महिन्यात धाड, मासरूळ, रायपूर मंडळात पाऊस झाला. हिवरानाईक, किन्हीनाईक, ईसोली या भागांत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झालेले आहे.
तसेच चिखली व बुलडाणा तालुक्यांत अजूनही मुसळधार पावसामुळे नदी-नाले एक होऊन शेती जलमय झाली आहे. परंतु प्रशासन ६५ मिलिमीटर पाऊस पडला नसल्याचे सांगत पंचनामे करण्याचे टाळत आहे. नदी-नाल्या काठची पिके तर जमिनीवर पडली.
वरून पावसाचा मारा होत असल्याने पिके सडत आहेत. परंतु अजूनही पंचनामे नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, असेही आमदार महाले यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.