Rain Update Maharashtra : राज्यात जोरदार पावसाचा इशारा; ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Update : बुधवारी राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात मागील दोन दिवसांपासून विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावत, धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठ नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. आज म्हणजेच बुधवारी राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

तर पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर,  सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

Weather Update
Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर कायम राहणार

तसेच उद्या म्हणजेच गुरुवारी पालघर, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट वर्तवला आहे. तर सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारा आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरी शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.    

Weather Update
Maharashtra Rain Alert : राज्यात तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज

तर शुक्रवारी पालघर, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसचा ऑरेंज अलर्ट तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा, वारे आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. शनिवारपासून मात्र पाऊस विश्रांती घेण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.    

मॉन्सूननं २३ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. बुधवारी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियानाच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माऊंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com