
Koyna Dam Affected Villagers Protest : कोयना धरणग्रस्तांचा ६५ वर्षांपासून पुनर्वसनाचा संघर्ष सुरू आहे. मात्र, अजूनही त्यांचं पुनर्वसन झालं नाही. त्यामुळे धरणग्रस्तांचा लढा निर्णायक टप्पावर आला असून धरणग्रस्तांनी २७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर येथे कोयना, तारळी, वांग, उरमोडी, चांदोली या धरणग्रस्तांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २ हजार धरणग्रस्तांनी आंदोलन सुरू केले आहे.
कोयना धरणग्रस्तांचा ६२ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक आंदोलन केल्यानंतर शासनाने धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. कोयनेच्या १५०० हजार लोकांना अजून जमीन मिळाली नाही. आणि ४००० लोकांचं अंशत: पुनवर्सन झालं नाही. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, २०२० मध्ये उपमुख्यमंत्र्यांनी पात्र खातेदारांची यादी तयार करण्याचे मान्य केले. धरणग्रस्तांनी जमिनींची पसंती झाल्या. मात्र, अजूनही जमीन वाटपाचे आदेश दिले नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. मात्र, त्यानंतर अजूनही शासन आदेश निघाले नाहीत.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका झाल्या; मात्र, झालेल्या बैठकांच्या इतिवृत्तावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांच्या सह्या झालेल्या नाहीत. बैठकांच्या इतिवृत्तावर सह्या होऊन आदेश काढले जावेत, यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाचा इशारा शासनाला दिला होता. मात्र, धरणग्रस्तांच्या जीवापेक्षा खुर्ची महत्वाची आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.