
नेहमीपेक्षा तापमानात कशी वाढ होते आहे, वेळीअवेळी पावसामुळं पिकांचं कसं नुकसान होत आहे हे आपण अलीकडील काही वर्षांत अनुभवतो आहे. यावर उपाय म्हणून इकोशीख या संघटनेने भारतात ४०० वनराई निर्माण करण्याचा संकल्प सोडलाय.
इकोशीख ( Eco Sikh )या संघटनेचं मुख्यालय अमेरिकेत आहे. संघटनेकडून गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येतंच मात्र शीख पर्यावरण दिवसानिमित्त संघटनेने आता औपचारिक घोषणा करून भारतातील वनराई निर्मितीची माहिती दिलीय. या संघटनेतर्फे भारतात ४०० वनराया निर्माण केल्या जाणार आहेत.
गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त एकोशीखतर्फे २०१९ सालापासून वनराई निर्मितीचा उपक्रम राबवण्याची सुरुवात झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर, अमेरिकेतही वृक्षलागवडीचे उपक्रम राबवण्यात येताहेत.
भारतात वनराया निर्माण करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणताना संघटनेने सर्व शीख धर्मियांचा सहभाग गृहीत धरलाय. या वनरायांना पवित्र वनराया संबोधले जाणार आहे. भारतात पंजाब, हरियाणा, कोलकाता, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, जम्मू, दिल्ली येथे या वनराया निर्माण केल्या जाणार असल्याचं इकोशीखचे संस्थापक राजवंत सिंग यांनी सांगितलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही संघटना भारतात वनराई उभारण्याचं काम करते आहे. प्रत्येक वनराईत किमान ५५० वृक्ष असणार आहेत. यात भारतातील पारंपरिक रोपांचा समावेश असणार आहे.
गुगल मॅपचा वापर करून वृक्षारोपणासाठी जागा शोधली जाते. पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने इकोशीखकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमात हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत असल्याचंही संघटनेनं नमूद केलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.