
Nagpur News : गाजराची मागणी वाढती असताना काही भागात हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गाजराच्या दरात सद्यःस्थितीत तेजी अनुभवली जात असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. कळमना बाजा समितीमधील रोजची गाजर आवक १५० क्विंटल इतकी आहे. अमरावतीमध्येही रोज सरासरी १०० क्विंटल गाजर आवक होत असल्याचे सांगण्यात येते.
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यासह इतर भागात गाजराचे उत्पादन होते. त्याच भागातून विदर्भातील विविध बाजारात गाजराची आवक होत असल्याची माहिती आहे. नागपूरच्या कळमना बाजाराचा विचार करता फेब्रुवारीच्या सुरुवातीला या बाजारात सरासरी ९०० क्विंटलची आवक होत होती.
१००० ते १४०० रुपये क्विंटल असा दर होता. त्यानंतरच्या काळात आवक ८०० ते ५०० क्विंटलच्या प्रमाणात होत होती. दर मात्र १००० ते १२०० रुपये असा स्थिर मिळत होता. फेब्रुवारीच्या पंधरवड्यात आवक ७०० क्विंटलवर तर दर ८०० ते १००० रुपयांवर पोहोचले.
त्यानंतर २६ फेब्रुवारीपासून दरात पुन्हा वाढ होत ते १००० ते १२०० रुपये क्विंटल असे झाल्याचे सांगण्यात आले. २७ फेब्रुवारीला पुन्हा एकदा दरात सुधारणा अनुभवण्यात आली. २००० ते ३००० रुपये क्विंटलवर ते पोहोचले. या वेळी आवक १५० क्विंटल अशी होती.
आता तीन महिन्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आवक वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जाते. अमरावतीच्या फळ आणि भाजीपाला बाजाराचा विचार करता या ठिकाणी १०० क्विंटल अशी आवक आहे. या बाजारात १००० ते १२०० असा दर गाजराला मिळत असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.