
Latur News : सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. चार-चार दिवस मोजमाप करण्यासाठी नंबर लागत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. नंबर लागल्यानंतर सोयाबीन खराब म्हणून परत केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. उडीद-मुगानंतर सर्वाधिक पेरणी सोयाबीन पिकाची होत आहे. तालुक्यात जवळपास ६९ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा झाला होता. यापूर्वी सोयाबीनला बाजारामध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्याचा कल सोयाबीन पिकाचे उत्पादन घेण्यातच वाढला.
मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून बाजारातील सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली असून ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने ४ हजार ८९२ रुपयांनी (हमी भावाने) सोयाबीन खरेदी करण्यासाठी सुरवात केली आहे. नाफेडमार्फत हे खरेदी सुरू असून यंदा मध्यंतरी झालेल्या पावसामुळे व सोयाबीनच्या काढणीच्या काळात पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.
नाफेडकडून चांगल्या प्रतीचे सोयाबीन खरेदी केले जात असल्यामुळे खरेदी केंद्रावर माल घालण्यासाठी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होताना दिसत आहे. चांगला उच्च प्रतीचा माल असला तरच खरेदी केली जात आहे.
थोडाही खराब माल असेल तर तो परत पाठवला जात आहे. त्यामुळे चार-चार दिवस खरेदी केंद्रावर वाहने लावून शेतकऱ्यांना वजन करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यंदा पावसात सोयाबीन मोठ्या प्रमाणात भिजले असल्यामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.