Unseasonal Rain in Vidarbha Agrowon
हवामान

Unseasonal Rain in Vidarbha : विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपलं! गारपिठीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Rain and hailstorms in Vidarbha : हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी (१० रोजी) हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे विदर्भामध्ये अवकाळी पावसाने शनिवारी संध्याकाळीच हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी अवकाळी आणि गारपिठीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान आता दुष्काळाच्या झळा बसत असतानाच आता विदर्भास पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले. विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत हा अवकाळी पाऊस झाला.

राज्यात तापमानात वाढ झाल्याने पावसासाठी पोषक हवामान तयार झाले होते. तर हवामान विभागाने विदर्भाला विजांसह पावसाचा इशारा देताना येलो अलर्ट दिला होता. तसेच उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहील असे सांगितले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तर शनिवारी अचनाक पडलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अमरावती रब्बी पिकांचे नुकसान

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. येथील धामणगाव, देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी आणि गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा व इतर भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात आला आहे.

वर्ध्याला आजही पावसाचा अंदाज

दरम्यान अवकाळी पावसाने वर्ध्याला चांगेलच झोडपून काढले. येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर जिल्ह्यातील देवळी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. येथील भिडी, तळणी, आकोली, लोणी, आगरगाव या भागात झालेल्या अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे उभी पिके भुईसपाट झाली. तर चणा, गहू, तूरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आजदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील तूर, हरभरा, गहू, भाजीपाला

या वादळी पावसाचा तडाखा यवतमाळ जिल्ह्यातील तूर, हरभरा, गहू आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी

विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर आज देखील राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान आज नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर हिंगोली, परभणीसह जालन्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

हाता तोंडाशी आलेला घास

विदर्भातील विविध जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी आणि गारपिठीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान हरभरा, गहू, तूर, कांदा, संत्रा व इतर भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गारपीट झाल्याने तयार झालेल्या कापसावर पाणी फिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ओल्या डोळ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

Crop Damage Compensation : एक महिना होऊनही मिळेना मदत

Maratha Reservation: मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप

Water Storage : उपयुक्त पाणीसाठा ८० टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT