Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढणार; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Maharashtra Weather Forecast: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून, कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह किनारपट्टी भागात तापमान वाढले असून, उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार कायम आहेत. किमान तापमानात वाढ झाली मात्र कमाल तापमान स्थिर दिसत आहे. हवामान विभागाने आजही कोकणत उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट दिला. तर राज्यातील उन्हाचा कडाका कायम राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील किनारपट्टीच्या भागात तापमानात सरासरी ४ ते ५ अंशाची वाढ झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर डहाणू येथे ३८.२ अंश सेल्सिअस तापमान होते.

रत्नागिरीतही ३७.२ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यातील किमान तापमानात मात्र चांगलीच वाढ झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

हवामान आजही कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज उष्ण आणि दमट हवामान इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर ठाणे जिल्ह्यासाठी उद्याही अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मार्चलाही उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT