Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता

Rain Forecast : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सोसल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ११) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सोसल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाच्या सरी पडत आहेत. आज (ता. ११) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशांपार गेले होते. मात्र दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झाली असून, पारा पुन्हा ३५ अंशांच्या खाली घसरला आहे. गुरुवारी (ता.१०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानात घट झाली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. ११) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातही वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.७, कोल्हापूर २८.५, महाबळेश्वर २४, मालेगाव ३१.८, नाशिक २९.८, निफाड ३१.३, सांगली ३०.९, सातारा २९.४, सोलापूर ३३.३, सांताक्रूझ ३०.६, डहाणू ३२.५, रत्नागिरी २९.७, बीड ३०.१, अकोला ३५.२, अमरावती ३३, भंडारा ३३, बुलडाणा ३१.६, चंद्रपूर ३१.४, गडचिरोली ३२.२, गोंदिया ३३.२, नागपूर ३३.१, वर्धा ३२.५, वाशीम ३३, यवतमाळ ३४.५.

कमी दाब क्षेत्र होतेय तीव्र

अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकून कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. वायव्येकडे जाताना या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून कर्नाटक, तमिळनाडू ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मॉन्सूनची वाटचाल थांबली

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २३ सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर वाटचाल अडखळत सुरू आहे. शनिवारी (ता. ५) महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर मात्र पाच दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल पुन्हा थांबली आहे. महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT