Dam  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भाग आणि घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भाग आणि घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यांवर सर्वाधिक २०५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असून, अनेक धरणांतून विसर्ग अजूनही सुरूच आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचा प्रभाव कमी अधिक होत आहे. परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. प्रामुख्याने शिरगाव, आंबोणे, दावडी, डुंगरवाडी, खोपोली या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाच्या जोर असला, तरी अधूनमधून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, कळमोडी, वडीवळे, गुंजवणी, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, मुळशी अशी १४ धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरल्याने या सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नगरमधील अकोले, नाशिक, पुणे या भागांत भंडरदरा, गंगापूर, मुळा, आढळा, दारणा, कडवा या धरणांतील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर कोयना धरणात ८०.०७ टक्के, धोम ७९.८९ टक्के, दूधगंगा ८५.११ टक्के, राधानगरी ९८.४३ टक्के भरले आहे. नगर, सोलापूर, खानदेशात प्रमाण कमी असून, अधूनमधून सरी बरसत आहेत.

सांगली जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात जोर कमी झाल्याने धरणातून दुसऱ्या दिवशीही विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र सर्व तालुक्यांत पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

कोकणात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी पावसाची संततधार सुरूच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून, वारा मात्र कायम आहे.

विदर्भात पावसाचा जोर मंदावला आहे. तर अमरावतीतील सावळीखेडा मंडलात ५४, चिखलदरा ५३, सेमडोह ४९, चुर्णी ४८ मिलिमीटर पाऊस झाला. गडचिरोलीतील गडचिरोली ५९, येवळी ४९, ब्राह्मणी ६१, एटापल्ली ७५, चातगाव ६१, कर्वाफा ४६, मुरूमगाव ४१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : अंगाव ५५, गोरेगाव ७०, नेरळ ६६, कशेळे ५९, वौशी ६३, खोपोली ६९, पाली, आटोने ६९, जांभूळपाडा ७७, बिरवडी ५४, कोलाड ५५, पोलादपूर, कोंडवी, वाकण ५७.

मध्य महाराष्ट्र : उंबरठाणा ५०, पेठा ६०, बामणोद ६१, माले, मुठे ७०, कार्ला १३३, खडकाळा ५०, लोणावळा ९६, वेल्हा ६३, पानशेत ५४, बामणोली ६३, केळघर ७३, करहर ५१, तापोळ, लामज ५५, कडगाव ६३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : सप्टेंबरमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३५६ कोटी रुपयांचे होणार वितरण; शासन निर्णय जारी

Monsoon Update: मॉन्सून देशाबाहेर

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Organic Fertilizer : भरडधान्याच्या उत्पादकतेत जैविक निविष्ठांचे मोठे योगदान ः तायडे

Raju Shetti: चालू हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, राजू शेट्टींनी कारखानदारांना दिली १० नोव्हेंबरची डेडलाईन

SCROLL FOR NEXT