उग्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. पण बऱ्याचदा दुष्काळी भागात चारा टंचाईमुळे जनावरे या हिरव्या वनस्पतींकडे आकर्षित होऊन नाइलाजास्तव विषारी वनस्पती खातात. त्यामुळे अशा विषारी वनस्पती खाल्याने जनावरांना विषबाधा होते. याशिवाय जास्त वेळ उपाशी असलेल्या जनावराला चरण्यासाठी सोडल्यानंतर जनावरे अधाशीपणाने चरतात. त्या वेळी देखील विषारी वनस्पती खाण्यात येऊन विषबाधा होण्याची शक्यता वाढते. विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या विषारी वनस्पतींची माहिती आपल्याला असायला हवी. आपल्याकडे सहसा कण्हेर, घाणेरी, रुई किंवा रुचकी, रानमोहरी, धोत्रा, बेशरम या विषारी वनस्पतींच प्रमाण जास्त आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.