Jalgaon News: खानदेशात टोमॅटो, पपई, मिरची केळीसह अन्य भाजीपाला पिकांची लागवड हवी तशी दिसत नाही. तसेच अनेक शेतकरी या पिकांसाठी पॉलिमल्चिंगचा उपयोग टाळत आहेत. यामुळे पॉलिमल्चिंगची मागणी घटली आहे. .यातून उत्पादन वाढीसह पाण्याची काटकसर करण्यास बळ मिळत असल्याने त्यांचा उपयोग वाढला होता. मागील दोन हंगामात हा उपयोग घटला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन वापरल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये चांगले उत्पन्न मिळते. त्याचबरोबर पिकांच्या सोबतीने वाढणाऱ्या तणावरदेखील नियंत्रण राखता येते. .Poly Mulching Farming : खानदेशात पॉलिमल्चिंगचा मोठा खप .त्यामुळे तण काढणीवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च यामुळे वाचतो. पेपरच्या आच्छादनामुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित होत असल्याने पीकवाढीला फायदा होत आहे. त्याचबरोबर किडीचा प्रादुर्भाव होण्यापासून पिकाला वाचविता येते. अतिरिक्त पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम उत्पादनावर होत नसल्याचे दावे केले जातात. यामुळे मल्चिंगचा वापर अधिक प्रमाणात वापरही खानदेशात सुरू होता..Poly Mulching in Agriculture : प्लॅस्टिक आच्छादनामुळे वाढतेय मातीचे प्रदूषण.नंदुरबारात मिरची, पपईसाठी, जळगावात टोमॅटो व केळीसाठी हा उपयोग वाढला होता. तसेच खानदेशात कलिंगड, खरबूज पिकासाठीदेखील पॉली मल्चिंगला उपयोग वाढला होता. पण अलीकडे केळी, मिरची, टोमॅटो, कलिंगड, पपई या पिकांत तोटा येत आहे. नैसर्गिक समस्याही वाढल्या आहेत. .ठळक बाबी अनेक शेतकरी केळी, खरबूज, पपईची लागवड कमी करीत आहेत. जे शेतकरी खरबूज, पपईची लागवड करीत आहेत, त्यातील अनेक जण पॉलिमल्चिंगशिवाय कार्यवाही करून घेत आहेत. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत, कारण शेतीमालाचे दर नीचांकी आहेत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.