खानदेशात मागील १५ ते २० दिवसांपासून उष्णतेत सतत वाढ होतेय. केळी बागा ४० अंश सेल्सिअस तापमानापुढे तग धरत नाहीत. लहान व निसवलेल्या बागांना याचा मोठा फटका बसतोय. घड सटकण्याची समस्या अनेक भागात तयार झाली आहे. या तापमान वाढीचा केळी बागांवर आणखी काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर subscribe करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर page ला like करायलाही विसरू नका.
तापमानात यंदा मार्चमध्येच अधिकची वाढ झाली. कमाल ४५ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान खानदेशात नोंदले गेले. केळी पट्ट्यात म्हणजेच जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार आदी तालुक्यांमध्ये अति उष्णतेमुळे केळीला फटका बसला.
मुबलक पाणी असतानादेखील लहान किंवा तीन महिन्यांच्या बागांमध्ये कोवळी पाने होरपळली आहेत. सकाळी ११ पासूनच ऊन तापू तापतेय. सायंकाळी पाचपर्यंत उष्ण वारे असतात. रात्री ९ पर्यंत उष्ण वारे वाहतात. खानदेशात निसवलेली किंवा महिनाभरात कापणीवर येणारी केळी सुमारे ३० हजार हेक्टरवर आहे. तर लहान किंवा जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केलेली केळी सुमारे पाच हजार हेक्टरवर आहे. या सर्वच बागांना उष्णतेचा फटका बसतोय. यंदा मार्चमध्ये सरासरी तापमान अधिक नोंदविण्यात आले. मागील वर्षी मार्चमध्ये सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस होते. यंदा हे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढून ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. यातच मार्चच्या सुरवातीला कमी तापमान होते आणि अखेरीस तापमान थेट ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.