Sugarcane Agrowon
टेक्नोवन

बाहेरच्या राज्यातून येणार ऊसतोडणी यंत्रे

गेल्या काही वर्षातील पावसाच्या अनियमितेचे प्रमाण वाढले आहे. अशाही परिस्थितीत ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वाळायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना ऊस सोडून अन्य पिकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे.

Team Agrowon

राज्यातील गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसतोडणीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) बाहेरच्या राज्यांकडून ऊसतोडणी यंत्र मागवले आहेत. महासंघाच्या या मागणीस गुजरात, कर्नाटक,तामिळनाडू आणि इतर काही राज्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

एप्रिल अखेरीस ही यंत्रे राज्यात दाखल होतील आणि अतिरिक्त उसतोडणीचे काम मार्गी लागेल, असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (NFCSF) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली आहे.

यंदा देशात मॉन्सून वेळेवर हजर होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या अंदाजामुळे साखर कारखान्यांत कार्यरत ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले आहेत. महाराष्ट्रातील ऊस गाळपाचा हंगाम संपत आला असून अद्याप ९० लाख टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी नुकतीच साखर उद्योग क्षेत्रातील भागीदारांची एक व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्याबाहेरील कारखान्यांना महाराष्ट्रात ऊसतोडणी यंत्रे पाठवण्याची विनंती केली आहे. राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी,जालना आणि हिंगोली जिल्ह्यांत प्रामुख्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न आहे. याखेरीज राज्याच्या अन्य भागांतही उसाचे गाळप व्हायचे आहे.

राज्याबाहेरील ऊसतोडणी यंत्रे एप्रिलपर्यंत राज्यात दाखल होतील. याखेरीज पश्चिम महाराष्ट्रातील ज्या कारखान्यांच्या गाळपाचे काम पूर्ण झाले आहे, त्या कारखान्यांकडील ऊसतोडणी यंत्रेही मराठवाड्यातील जिल्ह्यांकडे रवाना करण्यात येणार असल्याचे नाईकनवरे म्हणाले आहेत.

ऊसतोड मजुरांकडून दिवसाकाठी दीड एकर ऊस तोडून होतो. यातुलनेत माध्यम आकाराच्या ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून एका दिवसात ५ ते ६ एकरावरील ऊस तोडून होतो. ऊस तोडणी यंत्रांची ऊस तोडण्याची क्षमता लक्षात घेता राज्यातील गाळपाच्या प्रतीक्षेतील उसाच्या तोडणीचे काम मे महिन्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान राज्यात या हंगामात उसाच्या अतिलागवडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षातील पावसाच्या अनियमितेचे प्रमाण वाढले आहे. अशाही परिस्थितीत ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वाळायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांना ऊस सोडून अन्य पिकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन अन कापूस या पर्यायी पिकांची लागवड करावी, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

Rabi Crop Insurance: सोलापूर जिल्ह्यातील केवळ ४३ हजार जणांनी भरला पीकविमा

Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

Chikoo Farmers Issue: पालघरमधील चिकूच्या उत्पन्नाला कात्री

Flood Relief: जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मदत

SCROLL FOR NEXT