Crop Damage
Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीक नुकसान कळवूनही विमा कंपन्यांकडून पाहणीच नाही

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याबाबत पीकविमा कंपनीला (Crop Insurance Company) कळवून वीस दिवसांचा कालावधी होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी (Crop Damage Survey) झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नुकसान झाल्यानंतर दहा दिवसांत सर्व्हे होणे गरजेचे असताना अजूनही पाहणी नाही. त्यामुळे शेतातून पीक नष्ट झाल्यानंतर पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर आदी तालुक्यांतील अनेक भागांत अतिवृष्टीही झाली आहे. सतत झालेल्या पावसामुळे पिकांत पाणी साचून, मुळ्या सडू लागल्या, पाने पिवळी पडू लागली आहेत.

त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी पूर, अतिवृष्टीने पिके वाहून गेली. पिकांचे आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जात आहे. यंदा सव्वादोन लाख शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. पिकांचे नुकसान झाले तर ७२ तासांच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवावे लागते.

त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी नुकसानीची पाहणी, पंचनामा, सर्व्हेक्षण करून दोन दिवसांत अहवाल कंपनीला देतात. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे कळविल्यानंतर पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीकडून कृषी विभागाला कळवले जाते.

नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने नुकसान होत असताना व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवून वीस दिवसांचा कालावधी झाला, मात्र अजूनही नुकसानीची पाहणी करण्याला विमा कंपनीचे प्रतिनिधी आलेच नाहीत.

‘‘आमच्या सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत विमा कंपनीला कळवून वीस दिवस झाले. मात्र अजूनही विमा कंपनीचे लोक शेतात पाहणी करायला आले नाही.’’ असे कौडगाव येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पीक नष्ट झाल्यावर विमा कंपनीचे लोक फिरकले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतात की काय? अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

विमा कंपनीला कृषीचे पत्र

आपत्ती, पाऊस, पुराने शेतीचे नुकसान झाल्यावर व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळविल्यावर २ दिवसांत विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी व शेतकरी यांच्या उपस्थितीत पंचनामे होणे गरजेचे आहे. मात्र नुकसानीचे पाहणी करण्याला विमा कंपनीकडून उशीर होत असल्याने नुकसानीची वेळेत पाहणी करावी, या बाबत नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विमा कंपन्यांना दोन दिवसांपूर्वी पत्रही पाठवले असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT