Palghar News: विक्रमगड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून भातशेतीवर अवलंबून न राहता रब्बी हंगामात कडधान्ये आणि भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत; मात्र यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामातील भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे..या संकटातून सावरत, शेतकरी आता पुन्हा रब्बी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. पाण्याची योग्य सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी हिवाळी हंगामात पालेभाज्या घेण्यासाठी शेतीच्या कामात .Rabi Season: रब्बी हंगामाच्या मशागतीला वेग.व्यस्त आहेत. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामही अडचणीत आला असून, रब्बी लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. विहीर, नदी, नाले यांच्यातील पाण्याच्या स्त्रोतांच्या आधारे शेतकरी कारली, दुधी, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, पालक अशा विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड करत आहेत. .Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज प्रस्ताव वाढू लागले; कर्ज वितरण अल्प.या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी मिळत आहे. पालेभाज्यांसाठी साखळी पद्धतीने नळाद्वारे, पाटाद्वारे किंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या मजुरांनाही चांगला रोजगार मिळत आहे. .शेतात ओल व पाणी असल्याने उशिराने भाजीपाला लागवडीस सुरुवात केली आहे. सध्या थंडीचा मोसम असल्याने याच काळात भाजीपाला लागवड केली जाते. फेब्रुवारीमध्ये भाजीपाला तयार होऊन विक्री योग्य होत असतो. भाजीपाला पिकाला योग्य वेळी पाणी देणे गरजचे असते.- विजय सांबरे, शेतकरी, ओंदे गाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.