Fruit Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : विनयकुमार आवटे

वातावरणातील होणाऱ्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणूनच शासनाने हवामान आधारित फळपीक योजना सुरू केली असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी केले.

टीम ॲग्रोवन

नारायणगाव, जि. पुणे : वातावरणातील होणाऱ्या हवामान बदलांमुळे (Climate Change) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) होत आहे. म्हणूनच शासनाने हवामान आधारित फळपीक योजना (Fruit Crop Insurance) सुरू केली असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे (Vinaykumar Awate) यांनी केले.

नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र आयोजित हवामान आधारित पीकविमा योजना मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला होता. त्यावेळी श्री. आवटे नुकतेच केले. या वेळी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कृषिभूषण जितेंद्र बिडवई, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, मंडल कृषी अधिकारी डी. एस. जाधव, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक पांडुरंग जाधव, भारतीय कृषी विमा कंपनीचे जुन्नर तालुका प्रतिनिधी नंदकुमार खेडकर, कुलदीप शिरसाट, प्रगतिशील शेतकरी गुलाब नेहेरकर, जयसिंग वायकर, मधुसूदन देवकर आदी मान्यवर व द्राक्ष, डाळिंब व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

श्री. आवटे म्हणाले, की अवेळी पाऊस, गारपीट, कमी - जास्त तापमान, वेगवान वारे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सातत्याने बसत असतो. परंतु यापासून शेतकऱ्यांचा बचाव करायचा असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे.

विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख द्राक्ष पिकाकरिता १५ ऑक्टोबर, डाळिंबाकरिता १४ जानेवारी व आंबा पिकाकरिता ३१ डिसेंबर आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा फॉर्म कुठे भरायचा, नुकसान झाल्यावर काय करावे, विमा संरक्षण प्रकार, हवामान धोके आणि प्रमाणके याविषयी सखोल मार्गदर्शन कृषी विभागाकडून केले जात आहे.

कृषिरत्न अनिलतात्या मेहेर म्हणाले, की द्राक्ष हंगामात तापमान ६ अंशांपर्यंत खाली येते. परिणामी, द्राक्षांच्या मण्याला क्रॅकिंग येऊन मोठे नुकसान होते, तसेच सातत्याने येणाऱ्या धुक्यांमुळे देखील द्राक्ष बागांचे नुकसान होते.

याकरिता या बाबींचा विचार करून फळबाग योजनेत द्राक्ष पिकाच्या बाबतीत ठरवून दिलेल्या धोके पातळीमध्ये पुनर्विचार करून पीकविमा योजनेत बदल करावेत आणि शेतकऱ्यांना समजेल व परवडेल अशा पद्धतीने पीकविमा धोरण राबवावे, अशा सूचना शासनाला केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांनी केले. सूत्रसंचालन शास्त्रज्ञ राहुल घाडगे यांनी केले. तर डॉ. प्रशांत शेटे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

SCROLL FOR NEXT