Pune News: कापसाच्या सरकारी खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर पडला असून तेलंगणाने बाजी मारली आहे. केंद्र सरकारच्या वतीने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) हमीभावाने कापूस खरेदी करत आहे. देशात आतापर्यंत पाच लाख टन कापसाची खरेदी करण्यात आली. त्यात महाराष्ट्राचा वाटा केवळ ४० हजार टनाचा असून सर्वाधिक २ लाख टन कापूस तेलंगणातून खरेदी करण्यात आला. .यंदा सलग दुसऱ्या वर्षी तेलंगणात सर्वाधिक कापूस खरेदी झाली आहे. वास्तविक पाहता तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा उशिरा खरेदी सुरू झाली. मात्र तेथील राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेप आणि खरेदी मर्यादेत केलेले बदल यामुळे कापूस खरेदी जास्त झाली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या दृष्टीने जाचक निकष असल्यामुळे कापूस खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची १४ हजार ३७४ क्विंटल कापूस खरेदी.कापसाचे बाजारभाव सध्याच्या हमीभावापेक्षा एक हजार ते १२०० रुपयांनी कमी आहेत. मात्र, पावसामुळे कापसाची गुणवत्ता खालावली आहे. तसेच सीसीआयने यंदा कापूस खरेदीची मर्यादा कमी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना इच्छा असूनही हमीभावाने कापूस विकता येत नाही. सीसीआयच्या निकषांत न बसणारा कापूस शेतकरी खुल्या बाजारात विकत आहेत..राज्यात १६८ खरेदी केंद्रेसीसीआयने आतापर्यंत देशभरात कापूस खरेदीसाठी ५७० केंद्रे सुरू केली असून, त्यापैकी १६८ केंद्रे महाराष्ट्रात आहेत. परंतु त्यातील १३४ केंद्रांवरच कापसाची खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यातील २० हजार शेतकऱ्यांनी सीसीआयला हमीभावाने कापूस विकला. तर अजूनही शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असल्याने यापुढील काळात खरेदी वाढेल, असे सीसीआयच्या सूत्रांनी सांगितले..Cotton Procurement Delay: ‘सीसीआय’केंद्रांवर कापूस विक्रीसाठी आर्द्रतेचा अडथळा.अशी आहे दरपातळीसध्या महाराष्ट्रात कापसाला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर तेलंगणात ६ हजार ७०० ते ७ हजार १०० रुपये आणि उत्तर भारतात ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर आहे. गुजरातमध्ये सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपये आणि अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे विकला जात आहे..सरकीचे दर मात्र टिकून आहेत. कापसाबरोबर सरकीचीही गुणवत्ता आतापर्यंत अनेक भागात कमी आली. त्यामुळे सरकीला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर भारतात ३३०० ते ३५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे..हमीभावानेच कापूस विकण्याचे आवाहनआतापर्यंत पावसाने गुणवत्ता कमी झालेला कापूस बाजारात जास्त प्रमाणात येत होता. परंतु मागील काही दिवसांपासून चांगल्या गुणवत्तेचा कापूस वाढला आहे. हा कापूस सीसीआय हमीभावाने खरेदी करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा कापूस सीसीआयलाच विकावा, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.