Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: स्वस्त आयातीमुळे तुरीचा भाव मंदीत; आवक कमी असूनही हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव

Tur MSP India: तुरीच्या बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली असून, हमीभावापेक्षा तब्बल १००० रुपये कमी दर मिळतोय. सरकारने मोठ्या प्रमाणावर खरेदी करूनही स्वस्त आयात आणि खुल्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न राहत नाहीये.

Anil Jadhao 

Pune News: सरकार हमीभावाने विक्रमी तूर खरेदी केल्याचा दावा करत असले तरी बाजारभाव मात्र मंदीतच आहेत. खुल्या धोरणामुळे स्वस्त आयात आणि सरकारच्या खरेदीचा दबाव बाजारावर आहे. सध्या तुरीचे भाव हमीभावापेक्षा किमान १२ ते १५ टक्क्यांनी कमी आहेत. याचा फटका मात्र देशातील तूर उत्पादकांना बसत आहे.

तुरीचे भाव मागील हंगामात तेजीत होते. त्यामुळे सरकारने आयात खुली केली. भारताच्या या धोरणाने आफ्रिका आणि म्यानमारमधून मुक्त आयात सुरु आहे. तसेच तिथे उत्पादनही चांगले आहे. आता सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत तुरीची आयात खुली केली आहे. तूर आयातीवर शुल्क नाही किंवा इतर कुठलेही बंधन नाही. त्यामुळे आयातीचा लोंढाच आला. गेल्या वर्षभरात तुरीची आयात १२ लाख ६४ हजार टन झाली. ही आयात विक्रमी असल्याचे आयातदारांनी सांगितले.

केंद्र सरकारने हमीभावाने यंदा १२ लाख टन तूर खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यापैकी जवळपास ६ लाख टनांची खरेदी सरकारने केली. यापुर्वी फक्त २०१७-१८ मध्ये जास्त खरेदी झाली होती. मागील दोन वर्षे सरकारला तुरीची अपेक्षित खऱेदी करता आली नाही. कारण बाजारभाव जास्त होते. पण यंदा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने सरकारला खरेदी करता आली. मात्र पुढील काळात भाव वाढल्यानंतर सरकार हाच माल बाजारात उतरवणार, हे गृहीत धरून बाजारावर दबाव येत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशात तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मात्र, आयात मालाचे भाव देशातील तुरीपेक्षा कमीच आहेत. केंद्राने गेल्यावर्षी तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला होता. तर सध्या बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या मालाचे भाव ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आयात माल स्वस्त असल्याने देशातील बाजारवरही दबाव आला आहे.

आयात तुरीचे भाव कमी आहेत. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत आहे. आयात मालाचे भाव जास्त राहील्यास देशातील भावही सुधारतील. सरकारने तुरीची आयात करताना ७ हजार ५५० रुपयांपेक्षा कमी भावात आयात करू नये, अशी मागणी आयातदार आणि उद्योगांनीही केली आहे. तूर आयात हमीभावापेक्षा कमी भावात झाली नाही तर देशातील शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळेल. त्यामुळे शेतकरी कडधान्याचे उत्पादन वाढवतील आणि आयात करण्याची गरजच पडणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT