Onions Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

NAFED Onion Procurement : ‘नाफेड’मुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची आर्थिक कोंडी

Onion Procurement Dues : ‘नाफेड’च्या माध्यमातून १५० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात कांदा खरेदी केली होती.

मुकूंद पिंगळे

NAFED Onion Payment: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय कृषी, सहकार व विपणन महासंघाने (नाफेड) २०२२-२३ हंगामात २.५ लाख टन कांद्याची खरेदी उपखरेदीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाच्या माध्यमातून पूर्ण केली होती.

प्रत्यक्षात मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरेदी पूर्ण करून नियमानुसार रिकव्हरी दिली. मात्र आता तीन वर्षे उलटूनही कांदा खरेदी संबंधित सुमारे १५ कोटी रुपयांची मजूर देयके अजूनही बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

‘नाफेड’च्या माध्यमातून १५० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशात कांदा खरेदी केली होती. मात्र या कांदा खरेदीसंबंधी खरेदीपश्‍चात साठवणूक व वितरण कामाच्या मजुरीची १५ कोटी रुपये अजूनही अदा केलेले नाहीत.

‘नाफेड’ने खरेदी पूर्ण करून पुढे कंपन्यांकडून या कांद्याची रिकव्हरी घेतली. असे असतानाही पैसे मिळण्यासाठी कंपन्या ‘नाफेड’ कार्यालयात चकरा सुरू आहेत. महासंघाकडे पैसे मागत आहेत. मात्र ‘नाफेड’ने महासंघांना मजुरीची देयके न दिल्याने महासंघ कंपन्यांना देऊ शकत नाही, परिणामी कायदेशीर व वादाचे प्रसंग पुढे येत आहेत.

‘नाफेड’च्या कार्यालयात शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी गेल्यानंतर आमचा काही संबंध नाही, तुम्ही महासंघांकडे जा असे सांगण्यात येते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पैशाची वाट पाहून आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे. त्यामुळे ‘नाफेड’ने टोलवाटोलवी बंद करावी, असे एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

पैसे आले होते, पण...

‘नाफेड’ने या पैशांची केंद्राकडे मागणी केली होती पैसे आले होते. मात्र तत्कालीन अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालकांनी सुरुवातीला दीड रुपया अवैध पद्धतीने कमिशनची मागणी केल्यानंतर पुन्हा मागणी केली होती. महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ती मागणी पूर्ण न केल्याने ते पैसे परत गेले. नाफेड संचालकांच्या यापूर्वी काम केलेल्या महासंघालाही पैसे मिळाले नाहीत, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

‘नाफेड’ने तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कांद्यासंबंधी कंपन्यांकडे प्रलंबित ठेवलेला हिशेब ३१ मार्चपूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे. नाफेड व्यवस्थापकीय संचालकांना १६ जून २०२४ रोजी पाठपुरावा केला होता; मात्र त्याचे उत्तरही अद्याप आलेले नाही. तत्काळ हिशेब पूर्ण करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची आर्थिक कोंडी सोडवावी. अन्यथा, भीक मागो आंदोलन करून केंद्राला पैसे पाठवायचे का?
- विठोबा द्यानद्यान, भारतीय किसान युनियननचे सक्रिय कार्यकर्ते
‘नाफेड’च्या कार्यालयात गेल्यानंतर दोन वर्षांपासून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक आंदोलनाच्या पावित्र्यात होतो. मात्र पाठपुरावा ठेवला तरीही उपयोग झालेला नाही. कांदा खरेदीची जबाबदारी पाहणारे तत्कालीन अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनीलकुमार सिंग यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेला आहे. तर इतरही अधिकारी यात लक्ष देत नसल्याने शेतकरी कंपन्या आर्थिक अडचणीत आहेत.
- एक संचालक, कांदा खरेदीतील शेतकरी उत्पादक कंपनी
‘नाफेड’थेट शेतकरी उत्पादक कंपन्यासमवेत काम करत नाही. महासंघामार्फत काम करते. खरेदीत त्रुटी तसेच दस्तऐवज सादर करण्यात काही कमतरता असल्यास पेमेंट पूर्ण झालेले नसेल. मात्र याबाबत अधिक माहिती घेऊन यामध्ये लक्ष घातले जाईल व संबंधितांना मदत करू. कामकाज पारदर्शक झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे.
- केदा आहेर, संचालक, नाफेड, नवी दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी

Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे

Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज

SCROLL FOR NEXT