Cashew
Cashew  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बीला प्रतिकिलो १३० रुपये दर निश्चित

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजू बी दराबाबतचा संभ्रम दूर झाला असून आता प्रतिकिलो १३० रुपये दर मिळणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा दर निश्चित करण्यात आला आहे.

काजू बी दरावरून गेले चार महिने जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना, काजू उत्पादक आंदोलन करीत होते. प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काजू बागायतदारांकडून केली जात होती.

अनेक आंदोलने बागायतदारांनी केली, परंतु कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी काजूच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. सध्या बाजारपेठेत काजू बी प्रतिकिलो ११० रुपये सरसकट दिला जात आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, केसरकर यांच्या उपस्थितीत काजू बागायतदार, कारखानदार, व्यापाऱ्यांची सयुंक्त बैठक सावंतवाडी येथे झाली. फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संजय देसाई, आकाश नरसुले यांच्यासह शेकडो बागायतदार उपस्थित होते.

बैठकीत कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी सध्याच्या रक्कमेत पाच रुपये प्रतिकिलो वाढ करण्याचे मान्य केले. याशिवाय शासनाची रक्कम प्रतिकिलो दहा रुपये असा मिळून प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर सरसकट काजू बीला मिळणार आहे.

आयात शुल्काचा मुद्दा देखील बागायतदारांनी मांडला. केसरकर यांनी आचारसंहिता संपल्यानंतर काजू बीवरील आयातशुल्क अडीच टक्क्यावरून १८ टक्के होईल, असे स्पष्ट केले. शासनाने काजू बागायतदारांसाठी जाहीर केलेली रक्कम आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT