Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

NAFED Soybean Sale: मार्चमध्ये सोयाबीनचे भाव सरकारच्या विक्रीने आणखी पडतील : सोपा

Government Policy Impact: नाफेडने ३ मार्चपासून सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे आधीच घसरलेले बाजारभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) सरकारला विनंती केली आहे की, हा साठा १५ जुलैनंतरच विकला जावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही.

Anil Jadhao 

Pune News: सरकारने यंदा २० लाख टनांच्या दरम्यान सोसयाबीनची हमीभावाने खरेदी केली. नाफेडने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री ३ मार्चपासून करणार असल्याचे म्हटले आहे. आधीच बाजारात सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. त्यातच नाफेडने खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केल्यास भाव आणखी पडतील. त्यामुळे सोयाबीनची विक्री सरकारने १५ जुलैनंतर करावी, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे ही मागणी केली. सोपाने म्हटले आहे की, सोयाबीनचे भाव आणखी पडल्यास शेतकरी पुढील हंगामात सोयाबीनची लागवड कमी करतील. त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी होतील, असा कोणताही निर्णय सरकारने घेऊ नये. सोयाबीनची विक्री सरकारने उशीरा करावी, अशी मागणी सोपाने केली.

देशात यंदा नाफेड आणि एनसीसीएफने सोयाबीनची खरेदी केली. दोन्ही संस्थांनी मिळून जवळपास २० लाख टन सोयाबीन खरेदी केले. आता नाफेडने ३ मार्चपासून सोयाबीनची विक्री करणार असल्याचे म्हटले आहे. मुळात सोयाबीनचा बाजार दबावात असल्याने सरकारला सोयाबीनची खरेदी करावी लागली.

हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा किमान ९०० ते एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे. सरकारने हमीभावान २० लाख टन खरेदी करूनही सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. त्यामुळे शेतकरी आडचणीत आले आहेत. त्यातच सरकारने खरेदी केलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले तर त्याचा परिणाम दरावर होणार आहे. 

सरकारने पूर्ण सोयाबीन खरेदी न करताच खरेदी बंद केली. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. शेतकरी सोयाबीनचे भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. सध्या सोयाबीन ३ हजार ७०० ते ४ हजार १०० रुपयाने विकले जात आहे. यात सरकारने सोयाबीन विक्रीसाठी काढले तर बाजारात भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्चपासून भाव आणखी कमी झाल्यास शेतकरी येणाऱ्या खरिप हंगामात सोयाबीनची लागवड कमी करतील, अशी भीती सोपाने व्यक्त केली आहे. 

सोपाने कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली की, सरकारने खरेदी केलेले सोयाबीन १५ जुलैनंतर बाजारात विकावे. या काळात शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसते. तसेच खरिपातील सोयाबीनची पेरणीही जवळपास आटोपलेली असेल. त्यामुळे पेरणीवर याचा जास्त परिणाम होणार नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीनची विक्री मार्च महिन्यात न करता जुलै महिन्यात करावी, अशी मागणी सोपाने केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT